भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. निवृत्तीनंतर रायडूने तो राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार असल्याचे संकेत चाहत्यांना दिले होते. गुरुवारी (29 डिसेंबर) अखेर त्याने राजकारणात थेट प्रवेस केला आहे. आंद्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगक मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत रायडूने वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
अंबाती रायडू भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महत्वाचा फलंदाज राहिला आहे. पण गुणवत्ता असून देखील रायडूला बहुतांश वेळा भारतीय संघातून बाहेरच राहिला. इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना विजेतेपद पटकावले. आयपीएल 2024 सुरू असतानाच रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मागच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जने एमएस धोनीच्या नेतृत्वात आयपीएलची पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकली. बाद फेरीत रायडूचे योगदान महत्वाचे ठरले. आयपीएलदरम्यान, त्याने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर रायडू विदेशी टी-20 लीगमध्येही खेळताना दिसला.
रायडू वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश करताना मुख्यमंत्र जगन महोन रेड्डी उपस्थित होतेच. पण त्याचसोबत उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दीरेड्डी मिथून रेड्डी हेदेखील उपस्थित होते. वाएसआर काँग्रेसच्या सोशल मीडियावरून पोस्ट केली गेली की, “प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडू मुख्यमंत्री कार्यालयात वायएस जगन यांच्या उपस्थितीत वायएसआर काँग्रेसमध्ये सामील झाले. उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दीरेड्डी मिथून रेड्डी हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते.”
సీఎం క్యాంప్ కార్యాలయంలో ముఖ్యమంత్రి శ్రీ వైఎస్ జగన్ సమక్షంలో వైఎస్సార్ కాంగ్రెస్ పార్టీలో చేరిన ప్రముఖ భారత క్రికెటర్ అంబటి తిరుపతి రాయుడు.
ఈ కార్యక్రమంలో పాల్గొన్న డిప్యూటీ సీఎం నారాయణ స్వామి, ఎంపీ పెద్దిరెడ్డి మిథున్ రెడ్డి.#CMYSJagan#AndhraPradesh @RayuduAmbati pic.twitter.com/QJJk07geHL
— YSR Congress Party (@YSRCParty) December 28, 2023
दरम्यान, गुरुवारी अखेर रायुडूने राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत रायुडू थेट निवडणूक लवढवताना दिसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
रायुडूच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने 2013मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळला होता. कारकिर्दीतील एकूण 55 वनडे सामने खेळले, ज्यामध्ये 1694 धावा केल्या. यात तीन शतक आणि 10 अर्धशतक सामील आहेत. 6 टी-20 सामन्यांमध्ये रायुडूने भारतासाठी 42 धावा केल्या. 2019 मध्ये त्याने देशासाठी शेवटचा क्रिकेट सामना खेळला. आयपीएलमध्ये त्याला 2010 साली मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाची संधी मिळाली होती. त्यानंतर मागच्या आयपीएल हंगामापर्यंत दिग्गज फलंदाज आयपीएलमध्ये एकूण 203 सामने खेळले आणि यात 4328 धावा साकारल्या. (Ambati Rayudu joins YSR Congress)
महत्वाच्या बातम्या –
भारताला पहिल्या कसोटीत हरवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, कर्णधार बावुमा दुसऱ्या कसोटीतून बाहेर
हरमनसेनेचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाली, ‘आम्हाला तर वाटलं..’