भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला शुक्रवारी (27 जानेवारी) सुरुवात झाली. मालिकेतील हा पहिला सामना रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांवर चांगलेच वर्चस्व गाजवले. मागील काही काळापासून भारताच्या गोलंदाजी विभागाचा नियमित सदस्य झालेल्या अर्शदीप सिंग याच्यावर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी विशेष आक्रमण केले. त्यासोबतच त्याच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला.
टी20 विश्वचषकातील शानदार कामगिरीनंतर अर्शदीप सिंग याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत तो महागडा ठरलेला. रांची टी20 मध्ये तो संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज होता. या सामन्यात आपल्या पहिल्या तीन षटकांमध्ये त्याने अवघ्या 24 धावा देत कॉनवेचा महत्वपूर्ण बळी मिळवला होता. मात्र, डावातील अखेरचे षटक टाकताना डेरिल मिशेलने त्याच्यावर हल्ला चढवला. त्याने तीन षटकार व एक चौकार ठोकत या षटकात 27 धावा वसूल केल्या. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचे पृथक्करण 4 षटकात 51 धावा व 1 बळी असे झाले.
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एका सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा देणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानी आला. त्याने दुसऱ्यांदा 50 पेक्षा जास्त धावा खर्च केल्या. यापूर्वी मोहम्मद सिराज व हर्षल पटेल यांनी देखील प्रत्येकी दोन वेळा ही नकोशी कामगिरी केली होती.
या सामन्याचा विचार केल्यास, न्यूझीलंडने फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर, तुफानी फलंदाजी केली. फिन ऍलनने वादळी 35 धावांचे योगदान दिले. त्यानंतर कॉनवेने अर्धशतक करत संघाचा डाव पुढे नेला. अखेरच्या षटकांमध्ये मिचेल याने झंझावाती नाबाद अर्धशतक करत संघाला 176 पर्यंत मजल मारून दिली. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 2 बळी मिळवले.
(Arshdeep Singh Conceded 50 Plus Runs In T20I Second Time)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! हवेत उडी मारून वॉशिंग्टनने घेतला ‘सुंदर’ कॅच; बीसीसीआयही म्हणाली, ‘व्वा काय झेल आहे’
‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’सारखीच आहे ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजाची लव्हस्टोरी, प्रेमासाठी थेट…