---Advertisement---

बुमराह पाचही कसोटी सामने खेळू शकतो, शास्त्रींच्या काळातील गोलंदाजी प्रशिक्षकांचा सल्ला!

On: रविवार, जून 8, 2025 3:49 PM
---Advertisement---

जसप्रीत बुमराहच्या (jaspreet bumrah) फिटनेस बद्दल देशातल्या प्रत्येक क्रिकेट प्रेमीला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर इंग्लंडसाठी भारतीय टीम (Team india) रवाना होण्याआधी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head coach of team india) यांनी म्हटले होते की, बुमराह पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत केवळ तीन सामने खेळेल आणि ते कोणते असतील हे पुढे समजेलच. सध्या गंभीरच्या या वक्तव्यानंतर आता भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण (former bowling coach of team india bharat Arun) यांनी म्हटले आहे की, हा वेगवान गोलंदाज पाचही कसोटी सामने खेळू शकतो. मालिकेतील पहिला सामना याच महिन्यात 20 तारखेला खेळला जाणार आहे.

भरत अरुण म्हणाले, बघा गोष्ट अशी आहे की खूप जास्त किंवा खूप कमी गोलंदाजी दुखापतीचे कारण बनते. अशा परिस्थितीत आम्ही सामन्यात बुमराह द्वारा फेकल्या जाणाऱ्या षटकांची संख्या कमी करू शकत नाही. पण सामन्यांमध्ये फेकल्या जाणाऱ्या षटकांची संख्या बघता आम्ही त्याला सरावादरम्यान त्याच्यावर कमी दबाव टाकू शकतो. यादरम्यान तो त्याच्या रिकव्हरीवर काम करू शकतो. यादरम्यान जिममध्ये ट्रेनिंग सेशन किंवा फिजिओ सोबत बाकीच्या दुसऱ्या महत्त्वाच्या एक्सरसाइज देखील तो करू शकतो.

रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या प्रशिक्षक कार्यकाळात संघाचे महत्त्वाचे प्रशिक्षक राहिलेले भरत अरुण (Bharat Arun) पुढे म्हणाले, अशा परिस्थितीत बुमराहला नियंत्रित करणे खूप महत्त्वाचे राहील आणि एक गोष्ट खरी की, बुमराह जेव्हा संघात उपस्थित असेल, तेव्हा संघ एका वेगळ्या लयीत असतो. तो स्वतः तर चांगलं प्रदर्शन करतोच, पण बाकी गोलंदाजांना देखील चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रेरित करतो. ते म्हणाले, जे आत्मविश्वासाने बाकीचे गोलंदाज काम करतात ते निश्चित प्रकारे संघासाठी खूप महत्त्वाचे ठरते.

ते पुढे म्हणाले, मला बुमराह कडून सर्व पाच कसोटी सामने खेळण्याची आशा आहे. त्याने जर खूप लोड घेतला तर तो पाच सामने खेळू शकणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---