---Advertisement---

IND vs ENG: अश्विनने रिषभ पंतची केली ‘या’ पाकिस्तानी दिग्गजाशी तुलना!

r-ashwin-in-action-against-england-in-ranchi-reuters-072527734-1x1
---Advertisement---

अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) लीड्समध्ये पहिल्या कसोटी सामन्यामधील झालेल्या पराभवानंतर वक्तव्य केले आहे, तो म्हणाला भारतीय संघाने त्यांच्या फलंदाजीची वेळ वाढवण्यावर ध्यान दिले पाहिजे आणि रिषभ पंतने (Rishbh Pant) चालू कसोटी सामन्यात इंग्लंडच्या सरासरी आक्रमणाविरुद्ध त्याचं शतक द्विशतकांमध्ये बदललं पाहिजे. दोन्ही डावात फलंदाजां द्वारे झळकावलेल्या 5 शतकांनंतरही भारताने इंग्लंडला 371 धावांचा पाठलाग करू दिला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने आघाडी घेतली.

अश्विनने त्याचा यूट्यूब चॅनेलवर ‘एश की बात’ मध्ये म्हटले आहे, एका गोष्टीवर भारतीय संघाच्या फलंदाजीवर लक्ष देण्याची जास्त गरज आहे. ती गोष्ट म्हणजे तुम्ही वेळेबरोबरच तुमच्या डावामध्ये फलंदाजी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंग्लंडची क्षेत्ररक्षणाची वेळ वाढवली पाहिजे आणि त्यांनी मैदानावर खूप वेळ राहिले पाहिजे. मी एक गोष्ट सांगेन, घाबरू नका आणि खूप जास्त बदल करू नका. भारत पुढच्या सामन्यात मालिका बरोबर करू शकतो.

पण जर आपण इंग्लंडच्या रणनीती नाही समजू शकलो तर ही मालिका आपल्यापासून खूप लांब जाऊ शकते, अश्विनने हे देखील‌ म्हटले, चौथ्या दिवशी लवकर बाद झाल्याने खेळ भारताच्या हातून निसटला. (IND vs ENG Test Series)

जेव्हा तुम्ही पाचव्या दिवसापर्यंत तुमची फलंदाजी चालू ठेवत नाही, तर खेळ तिथेच संपतो. इंग्लंड संघाने जाहीरपणे हे सिद्ध केले आहे की, आव्हान कितीही धावांचं असलं तरी ते पूर्ण करतील. यामुळेच या गोष्टीचं आपण ध्यान ठेवलं पाहिजे की, आपण त्यांना कमी वेळ देऊ पण आव्हान मोठे द्यायचं आहे.

जर तुम्ही कोणतं आव्हान निर्धारित करत असाल तर तुम्ही ते 400 किंवा 450 धावांपर्यंत ठेवलं पाहिजे. मी म्हणेल की, सध्या इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकण्यासाठी कमीत कमी 450 धावा करणे गरजेचे आहे. तत्पूर्वी त्याने पंतंची तुलना धोनीशी नाही कोहलीशी केली पाहिजे असे म्हटले.‌ रिषभच्या द्विशतकीय खेळीचे कौतुक करत म्हटले, महेंद्रसिंग धोनी सोबत त्याची तुलना करणे योग्य नाही कारण धोनीने कधीच पाचव्या स्थानावर फलंदाजी केलेली नाही.

रिषभची तुलना विराट कोहली सारख्या खेळाडूंसोबत केली पाहिजे, तो एक मुख्य फलंदाज आहे. कारण त्याच्याकडे खूप वेळ आहे. अश्विनने रिषभच्या चेंडू निवडण्याच्या क्षमतेची तुलना पाकिस्तानचा महान फलंदाज इंजमाम उलहकशी केली.

अशा काही फलंदाजांकडे चेंडू लवकर ओळखण्याची क्षमता असते, ते लवकर चेंडू ओळखतात आणि खेळपट्टीवर स्थिर होतात. रिषभ पंत त्या खेळाडूंमध्ये आहे ज्यांच्याकडे हे कौशल्य आहे. रिषभने त्याच्या खेळीमध्ये अजून प्रयत्न केले पाहिजेत, असेही अश्विन म्हणाला.

फलंदाज म्हणून रिषभने शानदार खेळ केली आहे, पण जगात किंवा पुस्तकात असा कोणताच शॉट नाही जो रिषभ खेळू शकत नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---