पहिल्यांदा असे घडले की विजेत्या टीमला ट्रॉफी देण्यात आली नाही, उलट एका अधिकाऱ्याने ती ट्रॉफी फसवणुकीने स्वतः कडेच ठेऊन घेतली आहे. हा प्रकार पाकिस्तानच्या गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी केला, जे पीसीबीचे अध्यक्ष आणि एसीसी (आशियाई क्रिकेट कौन्सिल) प्रमुखही आहेत. प्रत्यक्षात भारताविरुद्ध त्यांच्या भडकवणाऱ्या विधानांमुळे टीम इंडियाला त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायची नव्हती, आणि त्यानंतर नकवी ट्रॉफी स्वतः सोबत घेऊन गेले. या प्रकरणावर बीसीसीआय सध्या कायदेशीर सल्ला घेत आहे.
एबीपीला बीसीसीआयच्या वरच्या सूत्रांनी सांगितले की आशिया कप ट्रॉफीसंदर्भात बीसीसीआय सध्या कायदेशीर सल्ला घेत आहे. याआधी मोहसिन नकवी यांनी म्हटले होते की ट्रॉफी त्यांच्या कडे आहे आणि टीम इंडियाचे कर्णधार येऊन ती घेऊ शकतात. तर बीसीसीआयने यासाठी स्पष्ट नकार दिला होता.
रिपोर्टनुसार, आशिया कप ट्रॉफी बुधवारपर्यंत एसीसीच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली नव्हती, तर ती मोहसिन नकवींसोबत त्यांच्या हॉटेलमध्येच ठेवलेली होती. ट्रॉफी एसीसीच्या ऑफिसमध्ये पोहोचवायची होती. आशिया कप 2025 ची विजेता टीम इंडियाला मोहसिन नकवी स्वतः ट्रॉफी देऊ इच्छित होते, पण सूर्यकुमार यादव आणि टीमने ते नाकारले. या वादानंतर पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव यांनी स्पष्ट केले की नकवीकडून ट्रॉफी घेण्याचे आदेश त्यांना बीसीसीआय किंवा सरकारकडून आलेले नव्हते. हे त्यांच्या टीमचे स्वतःचे निर्णय होते.
आशिया कप फाइनलनंतर 30 सप्टेंबरला झालेल्या एसीसीच्या महत्त्वाच्या बैठकीत ट्रॉफीचा मुद्दा उचलला गेला. रिपोर्टनुसार, मोहसिन नकवींनी ट्रॉफी बीसीसीआयला देण्यास नकार दिला आणि म्हटले की कर्णधार सूर्यकुमार यादव त्यांच्या ऑफिस मध्ये येऊन ट्रॉफी घेऊ शकतात. यावर बीसीसीआयने स्पष्ट नकार दिला.
सध्या बीसीसीआय या प्रकरणात कायदेशीर सल्ला घेत आहे की मोहसिन नकवी यांच्यावर कशी कारवाई करता येईल आणि ट्रॉफी शक्य तितक्या लवकर कशी आणली जाऊ शकते.






