भारतीय क्रिकेट संघात एकाहून एक बहाद्दर खेळाडूंचा भरणा आहे. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर हा त्यांपैकीच एक आहे. शार्दुलमध्ये कोणत्याही क्षणी सामना पाटलण्याची क्षमता आहे. तो गोलंदाजीबरोबरच फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही पटाईत आहे. मुंबईचा हा क्रिकेटपटू फार कमी वेळेत स्वतला एक शानदार अष्टपैलू म्हणून तयार करत आहे. त्याने गतवर्षी ओव्हल कसोटीत २ महत्त्वपूर्ण खेळी केल्या होत्या. ज्यामध्ये त्याने ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आता याच शार्दुलचे वरिष्ठ यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने कौतुक केले आहे.
शार्दुलमध्ये आत्मविश्वासाची कमी नाही
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज कार्तिकने (Dinesh Karthik) भारताकडून आतापर्यंत ५५ आंतरष्ट्रीय सामने खेळलेल्या शार्दुलची (Shardul Thakur) प्रशंसा करताना (Dinesh Karthik Praised Shardul Thakur) म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्यासाठी जागा बनवणे सोपे नव्हते. परंतु त्याचा आत्मविश्वास त्याला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पुढे घेऊन जाण्यास मदतशीर ठरला. तो क्रिकबझवर बोलत होता.
कार्तिक म्हणाला की, “मी पहिल्यांदा शार्दुलला २०१२ मध्ये मुंबईकडून रणजी ट्रॉफी खेळताना पाहिले होते. जेव्हा मी त्याला इंग्लंडमध्ये खेळताना पाहिले होते, तेव्हा त्याला पाहताच मला समजले होते की, त्याच्यात कोणत्या गोष्टीची कमी नव्हती, तर तो आत्मविश्वास होता.”
कार्तिकबद्दलच्या स्पर्धेबद्दल पंतनेही दिलीय प्रतिक्रिया
आशिया चषकात हार्दिक पंड्या आणि विराट कोहली यांचे संघात पुनरागमन झाल्यानंतर संतुलन बनवण्यासाठी रिषभ पंत किंवा दिनेश कार्तिकपैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. एका टीव्ही चॅनेलद्वारे यासंदर्भात प्रश्न विचारला गेला असता पंत म्हणाला की, “आम्ही कधीही अशाप्रकारे विचार करत नाही. आम्ही वैयक्तिकपणे नेहमी आमचे १०० टक्के देण्याच्या प्रयत्नात असतो. बाकी प्रशिक्षक आणि कर्णधारावर अवलंबून असते की, कोणत्या निर्णयाचा संघाला कसा फायदा करून देता येईल.”
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आता पुन्हा भारतीय प्रेक्षकांमध्ये जागणार उत्साह! ऑस्ट्रेलिया सह न्यूझीलंडही येणार भारताच्या दौऱ्यावर
अखेर ठरलंय! कॉमनवेल्थ नंतर आता क्रिकेट करणार ऑलिम्पिकची वारी
VIDEO। चाहत्यांना पाहायला मिळाला युवीचा पुराना अंदाज, तुफानी फलंदाजी करत ठोकतोय षटकार