नुकतेच भारताला ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 स्पर्धेत रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे टी20 संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माला हटवण्याची मागणी देखील होतेय. त्याचवेळी आता रोहितला हे पद सोडावे लागण्याची शक्यता वाढलीये. कारण, याबाबत बीसीसीआयचे पदाधिकारी व निवड समिती यांच्या दरम्यान एकमत झाल्याचे वृत्त आहे.
भारत पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरल्याने संघावर आणि महत्त्वाचे म्हणजे कर्णधार रोहितवर सर्वाधिक टीका होतेय. कमीतकमी टी20 मध्ये तरी भारताला वेगळा कर्णधार मिळावा अशी चर्चा क्रिकेट समीक्षकांपासून चाहते व्यक्त करत आहेत. बीसीसीआयनेदेखील ही गोष्ट गांभीर्याने घेतली असून, त्यावर चर्चा सुरू झाली आहे.
एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, टी20 कर्णधार बदलण्याच्या निर्णयावर निवड समितीचे एकमत झाले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या श्रीलंका दौऱ्याआधी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल. रोहित शर्माला हटवून त्या जागी हार्दिक पंड्या भारताचा नवीन टी20 कर्णधार बनेल.
रोहितमध्ये अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक असल्याने आणखी दीड दोन वर्ष तरी रोहित वनडे व कसोटी संघाचे नेतृत्व करू शकतो. मात्र, 2024 टी20 विश्वचषकात भारत हार्दिकच्या नेतृत्वात खेळू शकतो. रोहितसोबत याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. तो नुकताच ऑस्ट्रेलियातून आल्याने काही दिवसातच बीसीसीआय, निवडसमिती, प्रशिक्षक व रोहित यांच्या दरम्यान बैठक होईल.
भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडमध्ये असून टी20 मालिकेत हार्दिक भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी देखील आयर्लंड दौऱ्यावर त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्याच नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल विजेतेपद पटकावले.
(BCCI And Selection Committee Decide Taking T20 Captaincy From Rohit)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: ‘मोठे ऑक्शन होणार आहे’, जॉस बटलरने आयपीएल लिलावात अडकलेल्या ‘या’ ऑस्ट्रेलियन स्टारला केले स्लेज
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 आकडेवारी! मालिकावीर केएल राहुल, सुपर ओव्हर्समध्ये इंडियाचा विजय आणि बरेचं काही