भारतीय पुरूष क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची टी20 मालिका आणि तेवढ्याच सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्याची सुरूवात टी20 सामन्याने होणार असून पहिला सामना शुक्रवारी (18 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. टी20 मालिकेत भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे. तत्पूर्वी आपण दोन्ही संघातील टी20ची आकडेवारी पाहू.
1. भारत-न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 20 टी20 सामने खेळले गेले, त्यातील 11 सामने जिंकत भारत आघाडीवर आहे आणि न्यूझीलंडने 9 सामने जिंकले आहेत.
2. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दोन टी20 सामने सुपर ओव्हरमध्ये गेले होते. त्यातील 2020 हॅमिल्टनमध्ये झालेला तिसरा सामना आणि त्याचवर्षी वेलिंग्टन येथे झालेला चौथा सामना भारताने जिंकले आहेत.
3. विशेष म्हणजे भारताने 2007 ते 2016 मध्ये खेळलेले पहिले 5 टी20 सामने गमावले आहेत. 2007मध्ये जोहान्सबर्गचा सामना 10 धावांनी, 2009मध्ये क्रिस्टचर्चचा सामना 7 विकेट्सने, 2007मध्ये वेलिंग्टनचा सामना 5 विकेट्सने, 2012मध्ये चेन्नईचा सामना एका धावेने आणि 2016मध्ये नागपूरचा सामना 47 धावांनी गमावले होते.
4. न्यूझीलंडने टी20 विश्वचषकातील भारताविरुद्धचे तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामध्ये 2007मध्ये जोहान्सबर्गचा सामना 10 धावांनी विजय, 2016मध्ये नागपूरचा सामना 47 धावांनी विजय आणि 2021मध्ये 8 विकेट्सने विजय यांचा समावेश आहे.
5. भारताने 2019-20मध्ये न्यूझीलंडला त्यांच्याच देशात द्विपक्षिय मालिकेत 5-0 असे पराभूत केले. तो भारताचा सामन्याच्या फरकाने सर्वात मोठा विजय ठरला. त्या मालिकेत केएल राहुल (KL Rahul) मालिकावीर ठरला होता आणि त्याचा कारकिर्दीतील हा एकमेव मालिकावीर पुरस्कार आहे.
6. त्या मालिकेत राहुलने 56च्या सरासरीने 224 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश असून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद 57 राहिली.
7. गोलंदाजीत सर्वाधिक विकेट्स भारताच्या खेळाडूनेच घेतल्या होत्या. शार्दुल ठाकुर याने 5 सामन्यात 16 षटके टाकताना 8 विकेट्स घेतल्या होत्या. दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज जसप्रीत बुमराह ठरला होता. त्याने 6.45च्या इकॉनॉमी रेटने 6 विकेट्स घेतल्या होत्या.
8. न्यूझीलंडचा 2012मध्ये चेन्नईत एक धावेने मिळवलेला विजय टी20मधील भारताविरुद्धचा सर्वात कमी फरकाचा विजय ठरला आहे.
9. भारताने न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा 2019मध्ये केल्या होत्या. हॅमिल्टन येथे झालेल्या त्या टी20 सामन्यात भारताने 6 विकेट्स गमावत 208 धावा केल्या होत्या.
10. कोलिन मुन्रो याने 2017मध्ये राजकोट येथे खेळण्यात आलेल्या टी20 सामन्यात 58 चेंडूत 109 धावा केल्या होत्या. भारत-न्यूझीलंड टी20 मालिकेतील आतापर्यंतचे हे एकमेव शतक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्ध शुभमन गिलला टी20 पदार्पणाची संधी मिळेल का? पाहा दोन्ही संघाची संभावित प्लेईंग इलेव्हन
त्रिपाठी-बच्छावच्या कामगिरीने महाराष्ट्राची मुंबईवर मात; यशस्वीचे शतक व्यर्थ