जगभरात सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. भारतातही कोरोनाची परिस्थिती बिकट बनत आहेत. त्यातही महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोनाची प्रकरणे आहेत. याचाच परिणाम इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला बसू शकतो. सध्या आयपीएल २०२१ च्या आयोजनाप्रमाणे चेन्नई, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाता या ठिकाणी सामने होणार आहेत. पण असे असले तरी सध्याची परिस्थीती पाहाता बीसीसीआय पर्यायी ठिकाणाचाही विचार करत आहे.
बीसीसआय सध्याच्या वाढत्या कोरोना प्रकरणाच्या परिस्थितीतवर लक्ष ठेवून आहे, तसेच त्यांनी हैदराबाद हे राखीव ठिकाण म्हणून निवडले आहे. जर सध्या नियोजित ६ ठिकाणांपैकी एका ठिकाणावरील सामने रद्द करण्याची परिस्थिती उपस्थित झाल्यास हैदराबाद येथे सामने होऊ शकतात.
सध्या हा धोका मुंबईला अधिक आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत लॉकडाऊन करण्यात येऊ शकते, असा इशारा याआधीच दिला आहे.
असे असले तरी बीसीसीआयला राज्य सरकारचे आश्वासन आहे की लॉकडाऊन जरी झाले तरी आयपीएलवर त्याचा परिणाम होणार नाही, कारण ज्या संघाचे सामना मुंबईत होणार आहेत, ते संघ आधीच इथे आले असून बायोबबलमध्ये आहेत. पण तरीही बीसीसीआयने पुर्वनियोजन म्हणून हैदराबादला राखीव ठिकाण म्हणून निवडले आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार एका संघाच्या सदस्याने सांगितले आहे की अजून बीसीसीआयने हैदराबादला सामने हलवण्याबद्दल काहीही सांगितलेले नाही, तसेच या सदस्याला विश्वास आहे की नियोजित ६ ठिकाणीच स्पर्धा पार पडेल.
वानखेडे स्टेडियमचे ८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
धक्कादायक गोष्ट अशी की मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे आयपीएल २०२१ साठी एक प्रमुख स्टेडियम आहे. मात्र, हा आयपीएल हंगाम सुरु होण्याआधीच वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफमधील एक-दोन नव्हे तब्बल आठ सदस्य कोरोनाच्या कचाट्यात सापडले असल्याचीमाहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या स्टेडियमवर आयपीएल २०२१ चे एकूण १० सामने आयोजित करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! आयपीएल सुरु होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचा एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह
‘मी येतोय,’ शानदार फॉर्ममध्ये असलेला आरसीबीचा शिलेदार भारतासाठी रवाना; १८ चेंडूत केलंय अर्धशतक
बिग ब्रेकिंग! आयपीएलपुर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह