---Advertisement---

जय शहांची मोठी घोषणा! देशांतर्गत स्पर्धेतील खेळाडूही होणार मालामाल

Jay Shah
---Advertisement---

बीसीसीआयचे सचिव जय शहांनी एक मोठी घोषणा केली आहे. खरं तर, आता भारतीय देशांतर्गत स्पर्धांमध्ये, पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना सामनावीर आणि टूर्नामेंटच्या सर्वोत्तम खेळाडूच्या रूपात बक्षीस रक्कम मिळेल. याशिवाय ज्युनियर स्तरावरील स्पर्धांमध्येही क्रिकेटपटूंना सामनावीर आणि टूर्नामेंटचा खेळाडू म्हणून गौरविण्यात येईल आणि त्यांना बक्षीस रक्कम दिली जाईल.

बीसीसीआय सचिव जय शहांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. पोस्टमध्ये जय शहा म्हणाले की, “आम्ही आमच्या देशांतर्गत क्रिकेट कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सर्व महिला आणि ज्युनियर क्रिकेट स्पर्धांमध्ये सामनावीर आणि टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी बक्षीस रक्कम सादर करत आहोत. याशिवाय, विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली टूर्नामेंटमधील सिनियर पुरुषांसाठीच्या सामन्यातील खेळाडूंना बक्षीस रक्कम दिली जाईल. या उपक्रमाचा उद्देश देशांतर्गत सर्किटमधील उत्कृष्ट कामगिरी ओळखणे आणि बक्षीस देणे हा आहे, “या प्रयत्नात अटळ पाठिंबा दिल्याबद्दल सर्वोच्च परिषदेचे मनापासून आभार. आम्ही एकत्रितपणे आमच्या क्रिकेटपटूंसाठी आणखी चांगले वातावरण तयार करत आहोत. जय हिंद.”

गेल्या वर्षी बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांच्या बक्षीस रकमेत वाढ केली होती आणि रणजी ट्राॅफी विजेत्याला 5 कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले होते. इराणी चषकाचे रोख बक्षीसही दुप्पट करण्यात आले असून विजेत्यांना 25 लाखांऐवजी 50 लाख रुपये आणि उपविजेत्याला 25 लाख रुपये देण्यात आले आहेत. दुलीप ट्रॉफीमध्ये चॅम्पियन्सला आता 1 कोटी रुपये. तर उपविजेत्याला 50 लाख रुपये मिळतील. विजय हजारे ट्रॉफीच्या विजेत्याला 1 कोटी रुपये, दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला 50 लाख रुपये मिळतील.

हेही वाचा-

‘मी विराट भैय्यासोबत कधीच..’, रिंकू सिंगची किंग कोहलीबद्दल भावनिक प्रतिक्रिया
“यासाठी मी अग्नीपरीक्षा देखील देण्यास..”, पाहा टी20 कर्णधार सूर्या असं का म्हणाला?
महिला टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर…! ‘या’ दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---