भारतीय पुरूष क्रिकेट संघामध्ये बदलांना सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण निवड समिती बरखास्त केली. त्यातच बीसीसीआयने नव्या अर्जदारासांठी अटी आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या आहेत. ज्यामध्ये भारताच्या कर्णधार पदाबाबतही सांगितले आहे.
भारताच्या काही दिग्गजांनी इंग्लंडने कर्णधारपदाबाबत जे निर्णय घेतले तसे करावे असा सल्ला दिला होता, मात्र तो मान्य करण्यात आला नाही. इंग्लंडने पुरूष संघाच्या कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले आहेत. भारताने तसे करावे असे काही माजी क्रिकेटपटूंनी सुचविले होते. तेव्हा बीसीसीआयने ऐकले नाही, आता मात्र बीसीसीआयने स्पष्ट केलेल्या नव्या निवडकर्त्यांच्या जबाबदारीनुसार भारताच्या संघाचेही एक किंवा दोन किंवा तीन कर्णधार लवकरच दिसण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयने शुक्रवारी (18 नोव्हेंबर) चेतन शर्मा (Chetan Sharma) हे निवड समितीचे प्रमुख होते. त्यांच्यासह उत्तर विभागाचे प्रतिनिधी म्हणून हरविंदर सिंग, पूर्व विभागाचे प्रतिनिधी देवषिश मोहंती व दक्षिण विभागाचे प्रतिनिधी सुनील जोशी यांचा या निवड समितीत समावेश होता. या सर्व निवडकर्त्यांना बीसीसीआयने काढले आणि नव्या निवड अधिकाऱ्यांसाठी 28 नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, हे पण सांगितले.
नव्या निवड समितीत 5 सदस्यांचा समावेश असेल. त्यासाठी त्यांनी काही अटीदेखील ठेवल्या आहेत. अर्ज करणाऱ्या खेळाडूंनी भारतासाठी कमीत कमी 7 कसोटी व 10 वनडे सामने खेळलेले असावे. तसेच त्यांनी पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवत्ती घेतलेली असावी.
बीसीसीआयने नव्या निवडकर्त्यांच्या जबाबदारीमध्ये तिन्ही प्रकारासाठी वेगवेगळा कर्णधार हे स्पष्ट केले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचे नतृत्व करेल. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पुढील टी20 विश्वचषकापर्यंत (2024) तरी संघाचा कर्णधार असण्याची शक्यता आहे. BCCI’s big decision on captaincy; Rohit Sharma for ODI and Test, Hardik Pandya captain of T20!
🚨NEWS🚨: BCCI invites applications for the position of National Selectors (Senior Men).
Details : https://t.co/inkWOSoMt9
— BCCI (@BCCI) November 18, 2022
नवीन निवडकर्त्यांची मुख्य जबाबदारी:
1) योग्य आणि पारदर्शक पद्धतीने शक्य तितका सर्वोत्तम संघ निवडा
२) मजबूत बेंच स्ट्रेंथ तयार करा
३) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळ पाहण्यासाठी प्रवास करा
4) संघ निवडीवर मीडियाला संबोधित करा
5) प्रत्येक प्रकारच्या संघासाठी कर्णधाराची नियुक्ती करणे
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्मच! बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केल्यानंतर विराटच्या चाहत्यांचा टिवटिवाट
द्रविडच्या बचावासाठी उतरला अश्विन! रवी शास्त्रींना म्हणाला, ‘टी20 विश्वचषकासाठी त्यांनी किती मेहनत…’