---Advertisement---

संघसहकारी असावे तर असे! ‘या’ संघाकडून एकत्र खेळले अन् आता टीम इंडियाकडूनही मैदान गाजवण्यास सज्ज

---Advertisement---

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेलेल्या भारतीय संघाचा या दौऱ्यातील शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरु झाला आहे. या सामन्यातून भारताकडून टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. टी नटराजन भारताकडून कसोटी पदार्पण करणारा ३०० वा तर सुंदर ३०१ वा खेळाडू ठरला. याबरोबरच या दोघांच्या नावावर एक खास विक्रमही झाला आहे.

हे दोघेही देशांतर्गत क्रिकेट तमिळनाडू संघाकडून खेळतात. नटराजनने २०१५ मध्ये तर वॉशिंग्टनने २०१६ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तमिळनाडूकडून पदार्पण केले. त्यामुळे हे दोघेही रणजी ट्रॉफीमध्येही एकत्र तमिळनाडू संघाकडून याआधी खेळले आहेत. याचमुळे रणजी ट्रॉफीमध्ये संघसहकारी असेलेल्या २ खेळाडूंनी एकाच सामन्यातून कसोटी पजार्पण करण्याची सन १९९६ नंतरची ही पहिलीच वेळ आहे.

यापूर्वी असे १९९६ ला झाले होते. साल १९९६ ला कर्नाटककडून संघसहकारी म्हणून रणजी ट्रॉफीमध्ये खेळलेले वेंकटेश प्रसाद आणि सुनील जोशी यांनी बर्मिंगघम येथे इंग्लंडविरुद्ध एकाच सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते.

अश्विनकडून सुंदरला, तर भारत अरुण यांच्याकडून नटराजनला  कसोटी पदार्पणाची

या दोघांना सामन्य़ाच्या आधी कसोटी पदार्पणाची कॅप प्रदान करण्याच आली. सुंदरला आर अश्विनने कसोटी पदार्पणाची ३०१ क्रमांकाची कॅप दिली. तर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत आरुण यांनीं नटराजनला कसोटी पदार्पणाची ३०० क्रमांकाची कॅप प्रदान केली. याचे व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केले आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1349857847983525890

https://twitter.com/BCCI/status/1349859136717025280

सुंदर आणि नटराजनसाठी अविस्मरणीय कसोटीटी पदार्पण – 

सुंदर आणि नटराजनसाठी त्यांचे कसोटी पदार्पण अविस्मरणीय ठरले आहे. कारण सुंदरने कसोटी पदार्पणच्या पहिल्याच डावात गोलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथ सारख्या दिग्गद खेळाडूला बाद केले. तर नटराजनने पदार्पणाच्या पहिल्याच डावात पहिल्या दिवशी मॅथ्यू वेड आणि मार्नस लॅब्यूशेन यांना बाद करत २ विकेट्स आपल्या नावावर केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

अखेर तो क्षण आलाच! तब्बल ८९ वर्षांनंतर भारताला मिळाला ३०० कसोटीपटू, पाहा व्हिडिओ

पदार्पण करताच टी नटराजनच्या नावावर झाले कोणत्याच भारतीय क्रिकेटपटूला करता न आलेले ३ मोठे रेकॉर्ड

‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूरची कमाल! पहिल्याच चेंडूवर विकेट घेत केला ‘हा’ मोठा विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---