भारतीय संघ टी20 विश्वचषकाच्या सुपर 8 मध्ये पोहोचला आहे. 19 जूनपासून सुपर 8 चे सामने खेळले जातील. भारतीय संघाला सुपर 8 मध्ये अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियासोबत खेळायचे आहे. तसेच तिसरा संघ बांग्लादेश असू शकतो. अशा परिस्थितीत भारताचा माजी फिरकीपटू पीयूष चावला यानं त्या दोन संघांची नावं सांगितली, ज्यांच्यापासून भारतीय संघाला सावध राहावं लागेल.
‘स्टार स्पोर्ट्स’वर बोलताना पीयूष चावला म्हणाला, “आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलिया नेहमीच धोकादायक असतो. ते कोणत्याही संघाला पराभूत करू शकतात. आम्ही या विश्वचषकात त्यांची कामगिरी पाहिली आहे. याशिवाय अफगाणिस्तानचा संघही चांगला आहे. त्यांचे गोलंदाज चांगले आहेत. ते गोलंदाजीचा आनंद घेत आहेत.”
पीयूष चावला पुढे बोलताना म्हणाला, “बांग्लादेशनं चांगलं क्रिकेट खेळलं आहे, पण ते तेवढे धोकादायक नाहीत. ते अजूनही एक मजबूत संघ बनलेले नाहीत. मात्र आशा आहे की ते सुपर 8 साठी पात्र ठरतील.” ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्ताननं साखळी फेरीत एकही सामना गमावलेला नाही. तर भारतानं चार पैकी तीन सामने जिंकले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला.
सुपर 8 मधील संघांचे गट
गट 1 – भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांग्लादेश/नेदरलँड्स
गट 2 – इंग्लंड, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज
या टी20 विश्वचषकात न्यूझीलंडसह पाकिस्तानच्या संघानं निराश केलं आहे. दोन्ही संघ सुपर 8 साठी पात्र ठरू शकले नाहीत. अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला हरवून खळबळ उडवून दिली. तर दुसरीकडे अमेरिकेनं पाकिस्तानला पराभूत करून टी20 विश्वचषकातील सर्वात मोठा अपसेट केला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘रिटायर्ड हर्ट’ आणि ‘रिटायर्ड आऊट’ यात फरक काय? नामिबियाच्या कर्णधाराच्या नावावर विश्वविक्रम का नोंदला गेला?
ऑस्ट्रेलियाच्या विजयासह इंग्लंडला मिळालं सुपर 8 चं तिकीट, आतापर्यंत 7 संघ पात्र
बाबरपासून रिजवानपर्यंत, सगळ्यांचे पगार कापणार पीसीबी! पाकिस्तानी खेळाडूंवर बोर्ड नाराज