---Advertisement---

Asia Cup: फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! हार्दिक पांड्यासह 3 खेळाडू झाले संघाबाहेर

On: रविवार, सप्टेंबर 28, 2025 9:42 PM
---Advertisement---

एसीसी आशिया कप 2025 मध्ये आज भारताचा सामना पाकिस्तानशी रंगला आहे. टॉस जिंकून टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कर्णधार सूर्यकुमार यादवने प्लेइंग 11 मधून 3 खेळाडूंना बाहेरचा मार्ग दाखवला आहे. यात भारताचा माजी कर्णधार आणि सर्वात मोठा मैच विनर हार्दिक पांड्याचाही समावेश आहे. हार्दिक पांड्या बाहेर जाणे ही टीम इंडियासाठी सर्वात मोठी वाईट बातमी ठरली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता, जेव्हा संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या जखमी झाला. त्याच जखमेच्या कारणामुळे आज हार्दिक पांड्या प्लेइंग 11 मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी रिंकू सिंगला संधी मिळाली आहे. तसेच अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनाही प्लेइंग 11 मधून बाहेर जावे लागले आहे. हर्षित राणाच्या जागी शिवम दुबे याचे पुनरागमन झाले आहे, तर जसप्रीत बुमराहने अर्शदीप सिंगची जागा घेतली आहे. भारतीय संघाने आपली फलंदाजी खूपच मजबूत केली आहे. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आता टीम इंडियाच्या फायद्यात जाऊ शकतो. मात्र हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची गोलंदाजी खूपच कमकुवत दिसत आहे.

टीम इंडियाची प्लेइंग 11: अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

पाकिस्तानची प्लेइंग 11: साहिबजादा फरहान, फखर जमन, सैम अयूब, सलमान आगा, हुसेन तलत, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन अफरीदी, हॅरिस रऊफ, अबरार अहमद.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---