भारतीय क्रिकेट संघ गुरुवारपासून (27 जुलै) वेस्ट इंडीजसोबत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतून भारतीय संघ विश्वचषकासाठी आपल्या तयारीला सुरुवात करेल. भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनुभवी फलंदाज आहेत. मागील पंधरा वर्षांपासून या दोघांनी देखील भारतीय क्रिकेटची मोठ्या प्रमाणात सेवा करत अनेक विक्रम रचले आहेत. असे असतानाच श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वास याने एक मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघात रोहित व विराट हे अनुभवी फलंदाज असले तरी इतर फलंदाज तुलनेने युवा आहेत. यामध्ये शुबमन गिल, श्रेयस अय्यर, ईशान किशन व यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे प्रशंसा मिळते. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना वास म्हणाला,
“तुम्ही भारतीय संघाबद्दल विचाराल तर विराट आणि रोहित हेच ट्रम्पकार्ड नाहीत. संघातील अनेक युवा फलंदाज मला ट्रम्पकार्ड वाटतात. फलंदाजी सर्वच फलंदाजांकडे चांगली क्षमता असून ते एखादी सामने जिंकून देऊ शकतात. त्यामुळे भारताला विराट व रोहितवर अवलंबून राहावे लागत. विजयासाठी केवळ या दोघांनीच खेळण्याची भारतीय संघाला गरज नसते.”
रोहित हा 2007 पासून तर विराट 2008 पासून भारतीय संघाचा भाग आहे. दोघांनी देखील भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, अनेक वैयक्तिक विक्रम त्यांच्या नावे नोंद आहेत. याच मुलाखतीत बोलताना वास याने आगामी विश्वचषकात 350 धावा करणारा तसेच त्या धावांचे रक्षण करणारा संघच विश्वचषक जिंकू शकतो असे म्हटले. त्याने भारत व ऑस्ट्रेलिया यांना विजेतेपदासाठी अधिक पसंती दिली.
(Chaminda Vaas Said India No Need Of Virat And Rohit For Win)
महत्त्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप खेळणार का? वनडे रिटायरमेंट घेतलेला स्टोक्स पाहा काय म्हणाला?
आजपासून टीम इंडियाचे ‘मिशन वर्ल्डकप’! वाचा भारतीय संघाचे विश्वचषकापर्यंतचे सर्व वेळापत्रक