नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने एक डाव २५ धावांनी विजय मिळवला आहे. तसेच ही मालिका ३-१ ने आपल्या नावावर केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात २२७ धावांनी विजय मिळवणाऱ्या इंग्लंड संघाला पुढील ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशातच पराभूत झालेल्या इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकाने निराशा व्यक्त केली आहे.
इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांना इंग्लंड संघाच्या पराभवाने धक्का बसला आहे. या धक्क्यातून ते अजूनही बाहेर आलेले नाहीत.
सिल्वरवूड यांनी पत्रकार परिषदेत इंग्लिश मीडियासोबत संवाद साधताना म्हटले की, “चार कसोटी सामन्यात आर अश्विन (३२ बळी) आणि अक्षर पटेल (२७ बळी) यांनी मिळून आमचे ५९ गडी बाद केले. यावरून स्पष्ट दिसून येते की, ही मालिका खूप कठीण होती. आम्हाला पहिल्या डावात धावा करणे कठीण झाले होते. त्यांनी कठीण परिस्थिती निर्माण केली होती. याच कारणास्तव आम्ही त्यांच्यावर दबाव बनवण्यात अयशस्वी ठरलो. त्यांनी आमच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने अडकवून ठेवले होते.”
भारतीय गोलंदाजांचे केले कौतुक
ख्रिस सिल्वरवूड पुढे म्हणाले, “अश्विन आणि अक्षर यांनी आपल्या मायदेशातील परिस्थितींचा योग्यरीत्या फायदा घेत आम्हाला पूर्णपणे चीत केले. मी याचे भारतीय खेळाडूंना श्रेय देतो. त्यांनी पहिल्या कसोटीत पराभव मिळाल्यानंतर दमदार पुनरागमन केले. आम्हाला माहीत होतं की, भारतीय संघ पुनरागमन करणार आणि त्यांनी चांगलेच पुनरागमन केले. या गोष्टीचे काही काळ आम्हाला दुःख होणार.”
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! इंग्लिश फलंदाजाचा कसोटी मालिकेत तीनवेळा भोपळा, आता होणार संघातून बाहेर?
माझ्या ग्लासमध्ये लिंबू पाणी असो अथवा…! रवी शास्त्रींचा ‘तो’ व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल
‘किंग खान’च्या केकेआरची नजर तिसऱ्या विजेतेपदावर; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध होणार लढत