सध्या जगात सगळीकडेच कोरोनाने हाहाकार माजवला असून जगातील सर्वात मोठी क्रिकेट संस्था बीसीसीआयवरही या कोरोनाचा प्रभाव दिसून आला आहे. त्यामुळेच आयपीएलच्या 14 व्या सत्राची बक्षीस रक्कम निम्म्याने कमी करण्यात आली आहे.
मागील हंगामाप्रमाणे या वेळीही विजयी संघाला 10 कोटी रुपये दिले जाणार आहेत. या अगोदर म्हणजे 2019 साली विजयी संघाला 20 कोटी आणि उपविजेत्या संघाला 12.5 कोटी रूपये मिळाले होते. परंतु यावर्षी म्हणजेच आयपीएल 2021 मध्ये ही रक्कम निम्म्यावर ठेवण्यात आली आहे. साल 2008 पासून आयपीएलची बक्षीस रक्कम सातत्याने वाढती राहिली आहे, परंतु यावेळी कोरोनामुळे बक्षीसाची रक्कम कमी झाली आहे.
साल 2008 मध्ये सुरू झालेल्या आयपीएलची बक्षीस रक्कम गेल्या काही वर्षांत सतत बदलत आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामातील विजेत्यास 4.8 कोटी रुपये देण्यात आले होते. 2012 पर्यंत ही रक्कम सारखीच होती. पण यानंतर, 2013 मध्ये प्रथमच मुंबई इंडियन्सने चेन्नईचा 23 धावांनी पराभव करत आयपीएलचे विजेतेपद जिंकले. तेव्हा या हंगामात विजेत्या संघाला 12.5 कोटी आणि उपविजेत्याला 7.5 कोटी देण्यात आले होते.
साल 2014 मध्ये भारतात लोकसभा निवडणुका असल्याने आयपीएलच्या 7 व्या सत्राच्या 60 पैकी 20 सामने यूएईमध्ये पार पडले. या हंगामाचा विजेता असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला पुरस्कार म्हणून 15 कोटी रुपये देण्यात आले होते. तर उपविजेत्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला दहा कोटी रुपये देण्यात आले होते. तसेच 8 व्या मोसमातील विजेता मुंबई इंडियन्सला 15 कोटी रुपये, तर उपविजेत्या चेन्नईला 10 कोटी रुपये बक्षीस मिळाले होते.
आयपीएल 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभवाची धूळ चारून या हंगामाची ट्रॉफी जिंकली. त्यामुळे विजेत्या हैद्राबाद संघाला 15 कोटी रुपये, तर उपविजेतेत्या आरसीबीला 10 कोटी रुपये बक्षीस देण्यात आले होते. तसेच आयपीएलच्या दहाव्या हंगामाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्स र विजय मिळवून तिसरे विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यावेळी आयपीएल 2017 चा किताब जिंकणार्या मुंबई इंडियन्स संघाला 15 कोटी तर उपविजेत्या पुणे संघाला 10 कोटी रुपयांचे बक्षिसे देण्यात आले होते.
त्यानंतर दोन वर्षे निलंबित केलेल्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2018 मध्ये पुनरागमन केले आणि सनरायझर्स हैदराबादला अंतिम सामन्यात 8 विकेट्सने हरवून तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्जला 20 कोटी रुपयांचे बक्षीस तर उपविजेतेत्या सनरायझर्स हैदराबादला 12 कोटी 50 लाख रुपयांची रक्कम मिळाली होते.
त्यानंतर आयपीएल 2019 चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला होता, त्यामध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आयपीएल 2019 चा विजयी संघ मुंबई इंडियन्सला 20 कोटी तर उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला 12.50 कोटींची रक्कम देण्यात आली होते.
मात्र, यानंतर भारतासह जगभरात कोरोना वायरसने हाहाकार माजला. या महामारीचा परिणार अनेक क्षेत्रांवर झाला. हा परिणाम अनेक क्षेत्रांना अर्थिकदृष्ट्याही महागात पडला. त्यामुळे आयपीएल 2020 मध्ये दुबई झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यातील अंतिम सामन्यात विजय मिळवत मुंबईने पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद आपल्या नावे केले. पण गेल्या वर्षी विजयी संघाला 10 कोटी रुपये तर दिल्ली संघाला 6.25 कोटी मिळाले होते.
यावर्षीही आयपीएलचा 14 वा मोसम कोरोनाच्या काळातच पार पडणार असल्याने,यावेळीही आयपीएल 2021ची विजयी रक्कम 10 कोटी असेल, उपविजेतेत्या संघाला 6.25 कोटी रुपये आणि इतर दोन प्लेऑफलामध्ये पोहचणाऱ्या संघांना 4.375 कोटी रुपये मिळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बापरे! ‘या’ पाच खेळाडूंना आयपीएल दरम्यान जावे लागले होते तुरूंगात
याला म्हणतात क्रिकेटप्रेम! आयपीएलने नाकारलेला ‘हा’ खेळाडू चाललाय इंग्लंडला काऊंटी खेळायला
आयपीएल सुरू होण्यापूर्वीच चेन्नईला बसला फटका, ‘या’ बाबतीत झाले मोठे नुकसान