बर्मिंघममध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये यावर्षीपासून महिला क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी रवाना व्हायच्या ४८ तास आधी संघापुढे अडचणी वाढताना दिसत आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ६ सदस्यांना अद्याप व्हिसा मिळाला नाहीये. भारतीय संघ सध्या बेंगलोरमध्ये सराव करत आहे. संघाला रविवारी (२४ जुलै) बर्मिंघमसाठी रवाना व्हायचे आहे, पण व्हिसा न निळाल्यामुळे अडचणी येताना दिसत आहेत.
इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA) एका सूत्राने अशी माहिती दिली की, “काही व्हिसा आज मिळाले आणि अजून सहा व्हिसा मिळणे बाकी आहेत. यापैकी तीन व्हिसा खेळाडू आणि तीन खेळाडूंच्या सपोर्ट स्टाफचे आहेत. राहिलेले व्हिसा शनिवार (२३ जुलै) पर्यंत आले पाहिजेत. तसेही आपले या प्रक्रियेवर काहीच नियंत्रण नाहीये. सध्या ब्रिटेनचा व्हिसा मिळवण्यासाठी वेळ लागत आहे.” सूत्रांच्या माहितीनुसार खेळाडूंचे किट देखील अध्याप बेंगलोरमध्ये पोहोचले नाहीत. अशात क्रिकेट किट देखील शनिवारपर्यंत खेळाडूंपर्यंत पोहोच होईल, असे सांगितले जात आहे.
बीसीसीआयने २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ आधिच घोषित केला होता. भारतीय संघाला स्पर्धेतील पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९ जुलै रोजी खेळायचा आहे. त्यानंतर संघाला ३१ जुलै रोजी पाकिस्तानसोबत खेळायचे आहे. संघासोबत सपोर्ट स्टाफचे आठ सदस्य आणि राखील खेळाडूंच्या रूपात तीन खेळाडू अधिकच्या निवडल्या गेल्या आहेत.
दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सैरव गांगुली यांनी गुरुवारी (२१ जुलै) अशी माहिती दिली होती की, महिला संघातील एक सदस्य कोरोनाबाधित आढळली आहे आणि ती विलगिकरणात आहे. या खेळाडूची तब्येत सध्या सुधारत आहे, असेही सांगितले जात आहे.
कॉमनवेल्थ गेम्स के लिए भारतीय महिला टीम: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस. मेघना, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ति शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह, जेमिमा रोड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल और स्नेह राणा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: बुद्धिबळ खेळायला पैसे नसल्याने क्रिकेटर झालेला भारताचा स्टार खेळाडू ‘युजवेंद्र चहल’
अजहरूद्दीन शेर, तर धवन सव्वाशेर, वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या वनडेत ‘गब्बर’च्या नावावर मोठा विक्रम
WIvIND: काट्याच्या लढतीत टीम इंडियाचा विजयाने श्रीगणेशा; वेस्ट इंडिज अवघ्या ३ धावांनी पराभूत