वर्सेस्टर | भारतीय अ संघ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात एकमेव अनाधिकृत कसोटी सामना गुरुवारी (19 जुलै) कौंटी क्रिकेट ग्राउंडवर पार पडाला.
विजयासाठी 421 धावांचा पाठलाग करताना भारतीय अ संघ 167 धावांवर सर्वबाद झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी 3 बाद 11 धावांवरुन दुसऱ्या डावाची सुरवात करण्याऱ्या भारतीय संघाला इंग्लंड लायन्सने स्वस्तात गुंडाळले. या सामन्यात इंग्लंड लायन्सने भारताचा 253 धावांनी पराभव केला.
या सामन्यात पहिल्या डावात इंग्लंड लायन्सने 423 धावा केल्या होत्या. तर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 197 धावा केल्या होत्या.
दुसरा डाव इंग्लंड लायन्सने 5 बाद 190 धावांवर घोषित करत भारतीय अ संघाला विजयासाठी 421 धावांचे लक्ष दिले होते.
1 ऑगस्टपासून भारत- इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील अजिंक्य रहाणे, मुरली विजय, करुण नायर आणि ऋषभ पंत सहभागी झाले होते.
यापैकी रहाणे आणि पंतलाच समाधानकारक कामगिरी करता आली. ऋषभ पंतने दोन्ही डावात अर्धशतके केली. तर राहाणेने पहिल्या डावात 48 आणि दुसऱ्या डावात 49 धावा केल्या.
तसेच या सामन्यात इंग्लंड लायन्सकडून पहिल्या डावात 180 धावांची खेळी करण्याऱ्या अॅलिस्टर कुकला लय सापडल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा यू टर्न, विराट विषयी मी असे म्हणालोच नव्हतो
–गौतम गंभीर नंतर माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागचे धोनीविषयी मोठे वक्तव्य