रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यंदाचा टी20 विश्वचषक जिंकून 13 वर्षापासूनचा आयसीसी ट्राॅफीचा दुष्काळ संपवला. टी20 विश्वचषक जिंकताच टीम इंडियावर मात्र पैशांचा पाऊस पडला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस घोषीत केले आहे. तर विजेतेपदाचे 20.4 कोटी असे एकूण 145 कोटी 40 लाख रुपये भारतीय संघास मिळणार आहेत. संघामध्ये 15 खेळाडू व्यतीरिक्त, 15 सदस्यीय सपोर्ट स्टाफ आणि 5 सदस्यांची निवड समितीचा समावेश आहे.
भारतीय संघातील प्रत्येकी खेळांडूसोबत सपोर्ट स्टाफला देखील मोठी रक्कम मिळणार आहे. अहवालानुसार खेळाडूंना 5 कोटी तर सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 1 कोटी रुपये मिळणार आहे. तर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये 15 सदस्यांचा समावेश आहे. मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, 3 थ्रो डाऊन स्पेशलिस्ट, 3 फिजीओ, 1 ट्रेनर, लॅाजीस्टिक मॅनेजर, व्हिडीओ ॲनालिस्ट, सिक्युरिटी आणि इंटिग्रीटी मॅनेजर या पद्धतीने 15 सदस्याीयांचा सपोर्ट स्टाफ आहे.
भारतीय संघाने 17 वर्षानंतर पुन्हा एकदा टी20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. यंदाच्या स्पर्धेत टीम इंडियाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ एकही सामना गमावला नाही. फायनमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकावार 7 धावांनी विजय मिळवून टी20 विश्वचषक 2024 जिंकण्याचा भीम पराक्रम केला आहे.
भारत टी20 विश्वचषक जिंकताच संघाचे तीन प्रमुख खेळाडूंनी निवृत्ती घेतली. संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि अष्टपैलू रविंद्र जडेजाने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती झाहीर केली. यंदाचा टी20 विश्वचषक या तिघांसाठी शेवटचा ठरला. येणाऱ्या दिवसात बीसीसीआय टी20 सामन्यांची जबाबदारी युवा खेळाडूंवर देणार आहे. आगमी झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी भारतीय संघाची धुरा शुबमन गिलकडे देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला मिळणाऱ्या 125 कोटींची अशी होणार विभागणी, रोहितला 5 कोटी तर विराटला…
भारतीय संघात पदार्पणासाठी आयपीएल स्टार्स सज्ज, आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना
रोहित शर्मानंतर टी20 मध्ये भारताचा कर्णधार कोण होणार? जय शाह यांचं मोठं वक्तव्य