भारतीय क्रिकेट संघाचा दुसरा टी20 सामना श्रीलंका संघाविरुद्ध पुणे येथील एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर पार पडला. गुरुवारी (दि. 05 जानेवारी) पार पडलेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने भारताला 16 धावांनी पराभूत केले. यानंतर अनेकांनी भारतावर टीकास्त्र डागले. यामध्ये भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याचाही समावेश आहे. त्याने भारताच्या टी20 खेळण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे. भारताने पारंपारिक क्रिकेट सोडून वेगळे काहीतरी केले पाहिजे असे कार्तिकचे म्हणणे आहे.
‘भारतीय संघाला बदलावा लागेल खेळ’
माध्यमांशी बोलताना दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने भारतीय संघाच्या खेळण्यावरच प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला की, “आपण 2011नंतर विश्वचषक जिंकला नाहीये. आपल्याकडे जगातील सर्वोत्तम टी20 लीग आहे. आपल्याकडे सर्वोत्तम खेळाडू आहेत आणि राखीव खेळाडूही दमदार आहेत. तेव्हाही आपण जिंकू शकत नव्हतो. याचा अर्थ असा आहे की, आपण ज्याप्रकारे खेळत आहोत, त्यात काहीतरी कमी पडतंय. कदाचित खेळामध्येच बदल करण्याची गरज आहे.”
दिनेश कार्तिक पुढे म्हणाला की, “रोहित शर्मा याने भारतीय संघाचा खेळ बदलण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. तसेच, त्याने टी20 विश्वचषकापूर्वी द्विपक्षीय मालिकेतही आम्ही त्याचप्रकारे खेळलो होतो. आम्ही तसेच खेळलो होतो, ज्याप्रकारे खेळायचे होते. आपण ऑस्ट्रेलियामध्ये गेलो आणि तिथे त्याप्रकारे खेळू शकलो नाही. दुसरीकडे इंग्लंड संघाने पूर्ण स्पर्धेत तसाच खेळ दाखवला. त्यामुळे आता त्याची सवय झाली आहे आणि आपल्यालाही याच गोष्टीला आपली सवय बनवली पाहिजे.”
भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी20
नवीन वर्षाची सुरुवात दणक्यात करणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले. भारतीय संघाच्या गोलंदाजी फळीने खराब कामगिरी केली. पुण्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 206 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 8 विकेट्स गमावत 190 धावाच करता आल्या होत्या. भारताकडून श्रीलंका फलंदाजी करत असताना एकूण 7 नो- बॉल फेकण्यात आले होते. त्यामुळे भारतीय संघाला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने पुनरागमन करत चाहत्यांना निराश केले. त्याने पहिल्याच षटकात सलग 3 नो- बॉल फेकले आणि असा नकोसा विक्रम करणारा तो भारताचा पहिलाय गोलंदाज बनला. आता 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना राजकोट येथे 7 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. (cricketer dinesh karthik reacts on india s brand of t20 cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘नो- बॉल हा गुन्हाच…’, टीम इंडियाने दुसरा टी20 गमावताच हार्दिक पंड्याचे मोठे भाष्य
रोहित आणि विराटची टी-20 कारकीर्द समाप्त? मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडून मिळाले संकेत