बुधवारी (दि. 05 जुलै) बीसीसीआयने वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात आयपीएल 2023 गाजवणाऱ्या रिंकू सिंग याची निवड करण्यात आली नाही. संघ निवडण्यापूर्वी अशा चर्चा होत्या की, रिंकूला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्याची संधी मिळू शकते. मात्र, असे काहीच घडले नाही. रिंकूला संधी न मिळाल्यामुळे देशभरातील क्रिकेटप्रेमींना राग अनावर झाला आणि त्यांनी निवडकर्त्यांंवर टीकास्त्र डागले. मात्र, आता रिंकूच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय संघाच्या पुढील मालिकेत रिंकूला संधी मिळणे जवळपास पक्के मानले जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, रिंकू सिंग (Rinku Singh) आणि इतर खेळाडूंना आयर्लंड (Ireland) संघाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात सामील केले जाईल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा फलंदाज रिंकूला वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी भारतीय संघात का सामील करण्यात आले नाही. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, निवडकर्ते खेळाडूंना एकसोबत नाही, तर प्रत्येक मालिकेसोबत आजमावू इच्छित आहेत. आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील तीन सामने 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी खेळले जाणार आहेत.
रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की, “रिंकू आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारे इतर खेळाडू आयर्लंड दौऱ्यावर जातील. कारण, निवड समितीला एका वेळा सर्वांना आजमावायचे नाहीये. भारतीय वनडे संघात 7 खेळाडू असे आहेत, जे टी20 खेळणार नाहीत. कारण, ते खेळाडू आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. कारण, ते ऑगस्टमध्ये आशिया चषकात खेळतील.”
रिंकू आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांसारखे खेळाडू आयर्लंडला जातील. बीसीसीआयच्या निवड समितीने भारत अ संघाच्या आणखी दौऱ्यांची मागणी केली आहे. असे म्हटले गेले आहे की, वरिष्ठ संघात जागा देण्यापूर्वी त्यांना या दौऱ्यात आजमावले जाईल.
वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी20 संघात ‘या’ खेळाडूंना संधी
खरं तर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी आयपीएल स्टार यशस्वी जयसवाल आणि तिलक वर्मा यांसारख्या खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली आहे. जयसवाल राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो, तर तिलक मुंबई इंडियन्सचा भाग आहे. दोन्ही फलंदाजांनी आयपीएल 2023 हंगामात शानदार फलंदाजी केली होती. जयसवालने 14 सामन्यात 48.08च्या सरासरीने 625 धावा, तर तिलकने 11 सामन्यात 42.88च्या सरासरीने 343 धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघ
ईशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार. (cricketer rinku singh and other players will get chance in indian t20 team for series against ireland read here)
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियातून हाकालपट्टी होताच पुजाराने बॅटमधून दिले सडेतोड प्रत्युत्तर, ‘या’ स्पर्धेत ठोकले तडाखेबंद शतक
‘आता तू नाहीये म्हणून मीच…’, धोनीच्या वाढदिवशी पंतने उचलले ‘हे’ पाऊल, पाहा कसे केले सेलिब्रेशन