आपणा सर्वांना माहिती आहे की, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर इंडियन प्रीमियर लीगचा १३वा हंगाम भारताऐवजी संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये खेळला जात आहे. आतापर्यंत या हंगामातील एकूण १३ सामने पार पडले आहेत. दरम्यान सर्व संघांनी कमीत-कमी ३ सामने खेळले आहेत. तर सहभागी झालेल्या सर्व ८ संघांनी आतापर्यंत एक सामना तरी गमावला आहे. त्यामुळे कोणताही संघ अपराजीत राहिला नाही.
महत्त्वाचे म्हणजे, युएईच्या मैदानांवर गोलंदाजांपेक्षा जास्त फलंदाजांची जादू चालत असल्याचे दिसत आहे. कारण युएईतील अबू धाबी, दुबई आणि शारजाह या ३ मैदानांवर सध्या आयपीएलचे सामने खेळले जात आहेत. या ३ मैदानांपैकी शारजाह हे मैदान सर्वात छोटे आहे. त्यामुळे या मैदानावर आतापर्यंत पार पडलेल्या २ सामन्यात ४१च्या सरासरीने धावा बनल्या आहेत. तर दुबई आणि अबु धाबीच्या मैदानावर अनुक्रमे २५ आणि २७च्या सरासरीने धावा बनल्या आहेत.
त्यातही सामन्यात अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या डेथ ओव्हर्स (सामन्यातील शेवटची ४-५ षटके) गोलंदाजांसाठी जास्त डोकेदुखी ठरत आहेत. कारण आयपीएल २०२०मध्ये आतापर्यंत ६ वेळा अंतिम ४ षटकात फलंदाजी करणाऱ्या संघाने ६०पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यात त्यांच्या ७० षटकार आणि ७४ चौकारांचा समावेश आहे. दरम्यान ६वेळा देखील कोणत्या-न-कोणत्या गोलंदाजाने २५पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. आयपीएल २०१९मध्ये पूर्ण हंगामात मिळून ६वेळा गोलंदाजांनी हा नकोसा पराक्रम केला होता.
शिवाय आतापर्यंत झालेल्या १३ सामन्यांत, डावातील अंतिम षटक म्हणजे २०व्या षटकामद्ये गोलंदाजांनी तब्बल ३२५ धावा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीच्या ‘रॉकेट थ्रो’ पुढे मुंबईचा धुरंधर झाला घायाळ, व्हिडिओ होतोय व्हायरल
मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉक संघातून होणार बाहेर? ‘या’ विस्फोटक फलंदाजाला मिळू शकते संधी
अप्रतिम! मॅक्सवेलने घेतला अचंबित करणारा झेल, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
‘या’ तीन कारणांमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला पाहावे लागले पराभवाचे तोंड
गळ्यात २५ तोळ्याची सोन्याची चैन घालून गोलंदाजी करणारा भारताचा प्रविण कुमार
IPL २०२० : मुंबई आणि पंजाब सामन्यात झाली तब्बल ८ विक्रमांची नोंद