आयपीएल 2018चा मोसम आता अखेरच्या टप्यात आला आहे. विजेतेपदाच्या शर्यतीत आता फक्त 3 संघच उरले आहेत. बाकी संघांना या शर्यतातून बाहेर पडवे लागले आहे.
यावर्षी आयपीएलमध्ये विराट कोहली कर्णधार असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेही आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. याबद्दल नाराज झालेल्या विराटने आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे.
तसेच त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेही आव्हान संपुष्टात आल्याबद्दल खूप वाईट वाटले आसल्याचे म्हटले आहे. विराटने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने चाहत्यांची माफी मागितली आहे.
विराटने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे की “माझा ‘तूम्ही एकतर जिंकता किंवा शिकता’ या संकल्पनेवर विश्वास आहे. आम्ही अखेरपर्यंत लढत दिली आणि त्यासाठी सर्व दिले. पण एक गोष्ट नक्की यावर्षीच्या चूकांमधून शिकून पुढच्या मोसमात आम्ही नक्की चांगले पुनरागमन करू.”
तसेच विराटने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की “आम्ही योग्य मार्गाने गेलो नाही. या मोसमात आम्ही ज्या प्रकारे खेळलो ते अभिमानास्पद नव्हते. आम्ही जसे खेळलो त्याने मला खुुप वाईट वाटले. चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू न शकल्याबद्दल मनापासून माफी मागतो. ”
“आधी म्हटल्याप्रमाणे, हा आयुष्याचा एक भाग आहे आणि तूम्हाला जे हवे ते प्रत्येकवेळी मिळत नाही. आता पुढच्या मोसमात काय करायचे हे समजून घणे खेळाडूंवर आहे. खरचं पुढील मोसमात काही गोष्टी बदलू इच्छित आहे. पुढच्या वर्षी आम्ही आणखी प्रयत्न करू.”
विराटने यावर्षी 14 सामन्यात 54.80 च्या सरासरीने 548 धावा केल्या आहेत. तसेच तो 11 आयपीएल मोसमात सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.