आयपीएल २०२०चा अंतिम सामना मंगळवारी (१० नोव्हेंबर) दुबईमध्ये रंगणार आहे. हा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने अंतिम ११ जणांच्या संघात १ बदल केला आहे. त्यांनी राहुल चाहर ऐवजी जयंत यादवला संधी दिली आहे.
या सामन्यासाठी दिल्लीने अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही, त्यांनी क्वालिफायर २ मध्ये खेळवलेलाच संघ अंतिम सामन्यासाठीही कायम ठेवला आहे.
मुंबई इंडियन्सचा हा सहावा अंतिम सामना आहे. तर दिल्लीचा संघ पहिल्यांदाच अंतिम सामन्यात खेळणार आहे.
आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ –
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पांड्या, नॅथन कुल्टर-नाईल, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
दिल्ली कॅपिटल्स – शिखर धवन, मार्कस स्टॉयनिस, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिषभ पंत, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्किए, प्रवीण दुबे.
महत्त्वाच्या बातम्या –
AUS vs IND : आता मैदानात घुमणार प्रेक्षकांचा गजबजाट; ऑस्ट्रेलिया क्रिकेटने केली मोठी घोषणा
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी
ट्रेंडिंग लेख –
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय