---Advertisement---

भारतातील सर्वात सुंदर स्टेडियमवर होणार आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषकाचा पहिला सामना!

---Advertisement---

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी२० विश्वचषक होत आहे. भारत देश सलग दुसऱ्यांदा या विश्वचषकाचे आयोजन करत आहे. यापुर्वी २०१६मध्ये भारतात टी२० विश्वचषक झाला होता. २००७ साली सुरु झालेल्या या स्पर्धेतील ७वा विश्वचषक आयोजनाचा मान बीसीसीआयला मिळाला आहे. या स्पर्धेची सुरुवात भारतातील सर्वात नयनरम्य स्टेडियमवर होणार आहे.

भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील धरमशाला क्रिकेट स्टेडियमवर या स्पर्धेचा पहिला सामना होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे खजीनदार अरुण धुमल यांनी याबद्दल माहिती दिली आहे. “ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी२० विश्वचषक होत आहे. यातील सर्व सामने भारतात होणार आहेत. अशात स्पर्धेचा पहिला सामना धरमशाला येथे होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे अरुण धुमल म्हणाले.

भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातील ८ ठिकाणांपैकी धरमशाला हे एक ठिकाण आहे. स्पर्धेचे अजून वेळापत्रक जाहीर झालेले नाही. परंतू बीसीसीआयच्या खजीनदारांना पहिला सामना धरमशाला येथे होण्याची अपेक्षा आहे.

“धरमशाला येथे सामने आयोजीत केल्यामुळे पर्यटनाची राजधानी असलेल्या धरमशालाला जगभरात मोठी ओळख मिळेल. तसेच स्थानिक व्यवसायांना यामुळे मोठा हातभार लागेल. धरमशाला येथे बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दुष्काळ आहे. सामन्यांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटनात वाढ होईल,” असेही धुमल म्हणाले.

२०१६ ते २०२० पासून एकही सामना नाही
२०१६मध्ये धरमशाला येथे होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा राजकीय कारणांमुळे रद्द झाला. हा टी२० विश्वचषकातील सामना होता. त्यानंतर पुन्हा एकदा या स्टेडियमला आंतरराष्ट्रीय सामने आयोजनाच्या संधी मिळाल्या. २०१९ व २०२०मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारे दोन सामने पावसामुळे रद्द झाले.

२०१३ साली झाला होता पहिला आंतरराष्ट्रीय सामना
धरमशाला येथील स्टेडियमवर २७ जानेवारी २०१३ रोजी इंग्लंड विरुद्ध भारत संघादरम्यान पहिला आंतररराष्ट्रीय सामना झाला होता. त्यानंतर २० ऑक्टोबर २०१५ रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका व १८ मार्च २०१६ रोजी न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० सामना झाला होता. हा टी२० सामना विश्वचषकातील होता. भारतीय संघ या स्टेडियमवर २०१७ रोजी शेवटचा सामना खेळला आहे. एकूण ६ सामने या स्टेडियमवर टीम इंडिया खेळली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

म्हणून दिलीप वेंगसरकरांना म्हटलं जातं ‘लॉर्ड ऑफ लॉर्ड्स’; गावसकर-सचिनलाही तोडता आला नाही विक्रम

वानखेडे स्टेडियमवरील आयपीएल सामने दुसरीकडे व्हावे, मुंबईतील रहिवास्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना विनंतीपत्र

कोणी स्पॉट फिक्सिंग केली तर कोणी प्रतिस्पर्धाच्या किनशिलात मारली; ‘ते’ मोठे वाद ज्यामुळे आयपीएलचं नाव पार धुळीस मिळालं

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---