इंडियन प्रीमीयर लीग स्पर्धा ही बऱ्याचदा फलंदाजांच्या कामगिरीमुळे चर्चेत येत असतो. पण असेही काही गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. दर वर्षी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंवर सगळ्यांची नजर असते आणि हे त्यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ म्हणून आयपीएल स्पर्धा ओळखली जाते. प्रेक्षक सुद्धा चौकार -षटकारांची आतिषबाजी करणाऱ्या खेळाडूची फलंदाजी पाहणे पसंद करतात. परंतु कधी कधी प्रमुख खेळाडूंकडून प्रेक्षकांची निराशा सुद्धा होते .
आयपीएलमध्ये तंत्रशुद्ध फलंदाजीपेक्षा ताकदीने चौकार षटकार मारणारा खेळाडू आपल्या संघासाठी प्रमुख खेळाडू म्हणून कार्य करत असतो. आयपीएलमध्ये गोलंदाजसुद्धा फलंदाजी करताना षटकार मारताना दिसून येतात. पण या लेखात आपण अशा दोन खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहेत ज्यांच्या नावे आयपीएलमध्ये एकही चौकार -षटकार नाही.
1) सिद्धार्थ कौल :-
सिद्धार्थ कौल आपल्या प्रभावी वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु आयपीएलमध्ये फलंदाजी करताना त्याची बॅट चाललेली नाही त्याच्या नावे एकही चौकार षटकार नाही. कौलने 2013 पासून आयपीएलमध्ये एकूण 49 सामने खेळले असून त्याने एकूण 12 धावा काढल्या आणि 7 ही त्याची सर्वोच खेळी आहे. गोलंदाजीत मात्र त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने 54 विकेट्स घेतल्या आहेत.
2) यजुवेंद्र चहल :-
रॉयल चॅलेंजर बंगलोरचा स्टार गोलंदाज यजुवेंद्र चहल भल्याभल्या खेळाडूंना आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवत असतो, परंतु त्याची स्वतःची बॅटसुद्धा फलंदाजी करताना शांतच राहिलेली आहे. चहलने 2013 सालापासून आतापर्यंत 106 आयपीएल सामने खेळले असून त्यात त्याने फक्त 30 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच खेळी आहे फक्त 8 धावा आहे. ज्यात एकही चौकार किंवा षटकार समाविष्ट नाही. परंतु, गोलंदाजीत त्याने एकूण 106 सामन्यात 125 विकेट्स घेतलेल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार विराट कोहलीचे ‘हे’ ४ निर्णय ठरले वादग्रस्त
“विश्वचषकासाठी मी विराट कोहलीचा लकी चार्म”, भारतीय खेळाडूने संघात परतण्याचा व्यक्त केला मनोदय