लॉर्ड्स कसोटीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 4 दिवसांचा खेळ झाला आहे. भारतीय संघाने 6 गडी गमावून 181 धावा केल्या आहेत. भारताकडे 154 धावांची आघाडी आहे. या क्षणी सामन्यावर यजमान इंग्लंडची पकड असला तरीही त्यांना मैदानावर असलेल्या यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची भीती वाटत आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. जर भारताने इंग्लंडला 220 किंवा 230 धावांचे आव्हान दिले तर इंग्लंडला ते जड जाणार असल्याची चिंता त्याने व्यक्त केली आहे.
मोईन अलीच्या या विधानानुसार, जर पंतने तळाच्या फलंदाजांसह 65 ते 70 धावा जोडल्या. तर भारत या सामन्यात इंग्लंडला गुडघे टेकण्यास भाग पाडू शकतो. मोईन अली म्हणाला की, त्यांचा संघ एकट्या कर्णधार जो रूटवर अवलंबून राहू शकत नाही.
मोईन अली चौथ्या दिवसाच्या खेळावर बोलताना म्हणाला, ‘मला वाटते दोन्ही संघ उत्तम स्थितीत आहेत. दोन्ही संघ चांगला खेळ खेळत आहेत. मला वाटते की येथे 220-230 पेक्षा जास्त धावा निश्चितच आव्हानात्मक ठरू शकतात. पण त्या धावा करणे अशक्य होणार नाही. आम्ही फक्त कर्णधार जो रूटवर अवलंबून राहू शकत नाही. मला आणि बाकीच्या सर्व संघाला जास्तीत जास्त योगदान द्यावे लागेल.’
सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रिषभ पंत आणि इशांत शर्मा अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून होते. रिषभ पंतसारख्या स्फोटक फलंदाजाच्या उपस्थितीबद्दल इंग्लंडचा संघ नक्कीच चिंतेत असेल. पण मोईन अली म्हणाला की, खेळाच्या पाचव्या दिवशी त्यांचा संघ नवीन चेंडू घेईल आणि झटपट गडी बाद करून भारतीय संघाला पिछाडीवर लोटण्याचा प्रयत्न करेल.
अशात या सामन्यात नक्की कोणता संघ बाजी मारेल, हे पाहाणे रोमांचक ठरणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिकेत १-० अशी आघाडी घेईल.
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहच्या एकामागून एक वेगवान बाउन्सर्सला त्रासला इंग्लिश क्रिकेटर, मैदानातच ऐकवली खरीखोटी
भारताला विजयासाठी १६५ धावांची आघाडीही पुरेशी! यापूर्वी इंग्लंडविरुद्धच केलीय ‘ही’ अद्भुत कामगिरी
राहुलवर फक्त शॅम्पेन कॉर्क फेकले, माझ्यावर तर बाटल्या फेकल्या होत्या; दिग्गजाने ओढले ताशेरे