बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. गुरूवारपासून (22 डिसेंबर) मीरपूर येथे सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत बांगलादेशला पहिला डावात 227 धावांवर सर्वबाद केले. मात्र, मागील सामन्यात चमकदार कामगिरी केलेला फिरकीपटू कुलदीप यादव याला या सामन्यातून बाहेर बसवले गेले. त्यामुळे अनेक चाहते व समीक्षक नाराज झाले आहेत. मात्र, भारतीय संघाचा वरिष्ठ यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने कुलदीपला वगळण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले.
पहिल्या कसोटीत सामनावीर असलेल्या कुलदीपला वगळून संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकत याला संधी दिली. उनाडकत तब्बल बारा वर्षानंतर भारतीय कसोटी संघात खेळताना दिसत आहे. मात्र, त्यासाठी कुलदीपला वगळल्याने अनेकजण टीका करताना दिसले. मात्र, दिनेश कार्तिक याने वेगळे मत व्यक्त केले. त्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. तो म्हणाला,
“कुलदीपने शानदार गोलंदाजी केली यात वादच नाही. मात्र, ज्यावेळी तुम्हाला दोन फिरकीपटूंना संधी द्यायची असते त्यावेळी, तुम्ही तुमच्या दोन सर्वात खेळाडूंना संधी देणार. अश्विन सध्या भारताचा क्रमांक एकचा फिरकीपटू आहे. तर, मागील दोन वर्षात अक्षरने दुसऱ्या क्रमांकाची जागा घेतलीये. त्यामुळे एका सामन्यात कुलदीपने चांगली कामगिरी केल्यावर लगेच अक्षरकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. ढाका येथील खेळपट्टीवर तीन वेगवान गोलंदाज खेळवणे गरजेचे होते.”
कुलदीप यादव याने (Kuldeep Yadav) चट्टोग्राम कसोटीमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने 40 धावा करताना 8 विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे तो सामनावीरही ठरला होता.
(Dinesh Karthik Backs Team Management For Out Kuldeep Yadav)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चलनी नोटांवर शोभणार जगज्जेता मेस्सी? अर्जेंटिना सरकार लवकरच घेऊ शकते निर्णय
“म्हणून मी कर्णधार म्हणून धोनीची शिफारस केली”, 15 वर्षानंतर सचिनने केला खुलासा