विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर आता भारतीय संघासमोर बलाढ्य इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. भारतीय संघाला या मालिकेत विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात असले; तरीही हे विसरुन चालणार नाही की, इंग्लंड संघाने २०११, २०१४ आणि २०१८ मध्ये झालेल्या कसोटीत भारतीय संघाला पराभूत केले होते.
हा दौरा सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटूंनी अशा एका फलंदाजाचे नाव सांगितले आहे, जो इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत ५ शतक झळकावेल.
भारतीय संघाला येत्या ऑगस्ट महिन्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशातच दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटले की, “रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये सलामी फलंदाजी करण्याचा अनुभव मिळाला आहे. जर तो २०१९ विश्वचषक स्पर्धेसारखी कामगिरी आगामी कसोटी मालिकेत करण्यात यशस्वी ठरला, तर यात आश्चर्यकारक काहीच नसेल.”(Don’t be surprised if he repeats the world cup performance says Sunil Gavaskar)
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सुनील गावसकर यांनी म्हटले की, “आम्ही पाहिलं आहे की, दोन वर्षांपूर्वी रोहितने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत ५ शतक लगावले होते. याचबरोबर त्याने कठीण आणि थंड वातावरणातील परिस्थितीत दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध शतक झळकावले होते. ते अप्रतिम होते त्याने परिस्थितीचा पुरेपूर वापर केला होता. आता दोन वर्षानंतर त्याच्या अनुभवात आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे त्याने जर आगामी कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली तर मला याचे आश्चर्य होणार नाही.”
रोहित शर्माने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र तो मोठी खेळी खेळण्यास अपयशी ठरला असला. तरीही त्याने न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाजांना चांगलेच खेळून काढले होते. सर्वच स्तरातून अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, तो आगामी कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करेल. ही मालिका भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील ही पहिलीच मालिका असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘धवन’ची आर्मी लंकादहन करण्यासाठी होतेय सज्ज, इंट्रास्क्वॉड सामन्यात दाखवला दम; बघा फोटो