---Advertisement---

भारतीय संघाकडून अशा कोणच्या ३ चूका घडल्या, ज्यामुळे पाचवा कसोटी सामना झाला रद्द

team-india-test
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील पाचवा सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना कोरोना संक्रमण झाल्यामुळे हा सामना रद्द केला गेला आहे. पाचवा सामना रद्द झाल्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना जबाबदर मानले जात आहे. त्यांनी कसोटी मालिकेतील बायो बबलचे उल्लंघन करत रवी शास्त्री यांच्या पस्तक प्रदर्शन कार्यक्रमनात हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या लेखात आपण भारतीय संघाच्या तीन चूका पाहणार आहोत, ज्यामुळे इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना रद्द करावा लागला असू शकतो

१. भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी कोणाचीही परवानगी घेतली नाही. त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावण्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली किंवा जय शाह यांना कल्पना द्यायला हवी होती. संघाचे व्यवस्थापक गिरीश डोंगरे कोरोना नियमांचे पालन होत आहे की नाही, हे पाहतात. त्यांनी सांगितले की शास्त्री किंवा कोहली यांना शिक्षा मिळण्याची शक्यता नाही. अशात आता व्यवस्थापक डोंगरेंवर प्रश्न उपस्थित होतील.

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यानंतर रिषभ पंत कोरोना पाॅझिटिव्ह आढळला होता. त्याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय सचिव जय शाहने खेळाडूंना गर्दीपासून दूर राहण्याच्या सुचना दिल्या होत्या. पण त्या सूचना अंमलात आणता आल्या नाही.

२. संघातील सदस्य कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर काही दिग्गज खेळाडू घाबरले. बीसीसीआय आता खेळाडूंच्या मानसिक आरोग्याविषयी चिंतित आहे. आगामी काळात आयपीएल आणि टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. १० दिवसांचे विलगीकरण आणि बायो बबलमध्ये राहण्याच्या भीतीने खेळाडू सामन्यातून माघार घेण्यासाठी तयार झाले असावेत.

३. काही दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याने म्हटले की, ‘असे मुळीच नाही की, रवी शास्त्री कार्यक्रमाला गेले म्हणून आजारी पडले. संघातील खेळाडू हॉटेलमध्ये ज्या लिफ्टचा वापर करतात, त्याच लिफ्टचा वापर सामान्य लोक ही करतात.’ याचा अर्थ कदाचीत हॉटेलमध्येही भारतीय संघातील सदस्यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय संघ पाचव्या कसोटीत मैदानात का उतरला नाही? दिनेश कार्तिकने सांगितले खरे कारण

‘आम्हाला वेगळे टाकू नका, धार्मिक वातावरणाची शिक्षा देऊ नका’, अफगाणिस्तान क्रिकेटच्या सीईओ यांची विनंती

‘निर्णायक क्षणी भारतीय संघाने चांगली कामगिरी केली’, अँडरसनने विराटसेनेवर उधळली स्तुतीसुमने

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---