भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसरी कसोटी बुधवारपासून (२५ ऑगस्ट) लीड्स येथे सुरू होत आहे. पण, या अगोदरच इंग्लंड क्रिकेट संघाचे खेळाडू आणि बोर्ड यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. वादाचे मूळ इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) घेतलेला निर्णय आहे, ज्याअंतर्गत इंग्लिश बोर्ड आपल्या उच्च अधिकाऱ्यांना 2.1 दशलक्ष पौंड (सुमारे 21 कोटी रुपये) बोनस वितरीत करणार आहे. बोर्डाच्या या निर्णयामुळे इंग्लंडचे क्रिकेटपटू संतप्त आहेत. कारण ईसीबीने कोरोनामुळे गेल्यावर्षी खेळाडूंच्या वेतनात 15 टक्के कपात केली होती. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांना बोनस म्हणून एवढी मोठी रक्कम देण्याचा निर्णय खेळाडूंना अजिबात आवडलेला नाही.
एका इंग्लंडच्या क्रिकेटपटूने या विषयावर स्पोर्ट्स मेलशी केलेल्या संभाषणात सांगितले की, “मी आणि माझे सहकारी मंडळाच्या या निर्णयावर नाराज आहेत.” आणखी एका खेळाडूने गार्डियन वृत्तपत्राला सांगितले की, “ईसीबीचे उच्च अधिकारी फक्त स्वतःचाच विचार करत आहेत. गेल्या 18 महिन्यांपासून देशासाठी बायो-बबलमध्ये राहत असलेल्या संघाकडे त्यांनी कधीही लक्ष दिलेले नाही. ईसीबीचे कनिष्ठ कर्मचारी देखील या बातमीमुळे निराश झाले आहेत, कारण त्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये अथक परिश्रम घेतले होते.”
ही बोनस रक्कम ईसीबीचे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन, संजय पटेल आणि इतर अधिकाऱ्यांमध्ये विभागली जाईल. हा बोर्डाच्या दीर्घकालीन प्रोत्साहन योजनेचा (LTIP) भाग आहे. शीर्ष पदाधिकाऱ्यांना मंडळाशी संलग्न ठेवण्यासाठी ही योजना 2017 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत 2022 मध्ये संपत आहे. त्यानंतरच ईसीबी ही बोनस रक्कम वितरीत करेल. किंतु काही तज्ञ या बोनसकडे द हंड्रेडच्या यशस्वी आयोजनाचे बक्षीस म्हणून पाहत आहेत.
ईसीबीने गेल्यावर्षी 62 कर्मचार्यांना कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी रजेवर पाठवले होते. काउंटी संघांनाही कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या प्रमाणात कपात केली होती. एवढेच नाही तर, बोर्डाने यापूर्वी 167 कोटी रुपयांचे नुकसान देखील दाखवले आहे. याव्यतिरिक्त, त्यांना महसूलाच्या स्वरूपात एकूण सुमारे १ हजार कोटींचा तोटा झाला होता. अशात बोर्डाने आपल्या उच्च अधिकाऱ्यांना बोनस वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे, हे टीकेचा धनी ठरला आहे.
नुकसानानंतरही ईसीबी 2022 मध्ये बोर्डाच्या अधिकाऱ्यांना बोनस वितरीत करेल. या गोष्टीमुळे खेळाडू हताश झाले आहेत. ईसीबीच्या या निर्णयाबद्दल सर्वत्र असंतोष पसरला आहे. व्यावसायिक क्रिकेटपटू असोसिएशनचेही याकडे लक्ष वेधले आहे. कारण गेल्यावर्षी कोरोनामुळे खेळाडूंनी सुमारे 10 कोटी रुपयांची बक्षीस रक्कमही सोडली होती. ईसीबीच्या केंद्रीय करारात समाविष्ट खेळाडूंनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये 15 टक्के वेतन कपातीचा निर्णय स्वीकारला होता. तसेच कोरोना महामारीसाठी 5 लाख पौंड अर्थात सुमारे 5 कोटी रुपये दान केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच टॉस जिंकल्याने कर्णधार कोहली शॉक; दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
दहा वर्षात अँडरसनचा टीम इंडियावर चौथा वार! वाचा ही खास आकडेवारी