हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघ शुक्रवारी (26 मे) आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात पोहोचला. इंडियन प्रीमियर लीगचा हा 16 हा हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज आपला 10वा अंतिम सामना खेळण्यासाठी तयार आहे. लीगचा दुसरा एलिमिनेटर सामना शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला गेला. रोहित शर्माच्या नेतृत्वातीत मुंबईला या सामन्यात 62 धावांनी पराभव मिळाला. गुजरातच्या विजयात शुबमन गिलसह मोहित शर्माचे योगदान महत्वाचे राहिले. मोहितच्या मते सूर्यकुमार यादवने त्याला सहा षटकार जरी मारले असते, तरी आपली रणनीती तो बदलणार नव्हता.
मुंबई इंडियन्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. 20 षटकात गुजरात टायटन्सने 3 बाद 233 धावा केल्या. यात सर्वात मोठे योगदान राहिले शुबमन गिल (Shubman Gill) याचे. गिलने 60 चेंडूत 129 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ 18.2 षटकांमध्ये 171 धावा करून सर्वबाद झाला. मुंबईला सर्वबाद करण्यासाठी मोहित शर्मा (Mohit Sharma) गुजरात टायटन्सचे सर्वात मोठे शस्त्र ठरला. मोहिनेत 2.2 षटकांमध्ये 10 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याकडून मुंबईच्या चाहत्यांना विजयाच्या अपेक्षा होत्या. मात्र, मोहिनेत डावातील 15व्या षटकात त्याता त्रिफळाचीत केले आणि मुंबईचे अंतिम सामन्याचे स्वप्न धुळीत मिळवले. विजयानंतर मोहिने सूर्याच्या विकेटविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली.
सामना संपल्यानंतर मोहित शर्मा माध्यमांसमोर आला. यावेळी त्याने सूर्यकुमारसाठी आखलेल्या रणनीतीचा खुलासा केला. मोहीत म्हणाला, “एवढ्या झटपट पाच विकेट्स मिळवण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, ते पाहून एकवेळी आम्ही धास्ती घेतली होती. हे दोघे बाद झाले नाहीत, तर सामना आपल्या हातातून जाऊ शकतो, असं मला वाटत होतं. मी आधीच ठरवलं होतं की, सूर्यकुमारला गोलंदाजी करताना जास्त प्रयोग करणार नाही.”
“आमची एक बैठक झाली होती, ज्यात असे ठरले होते की, सूर्यकुमारसमोर जास्त प्रयत्न करायचे नाहीत. असे केले, तर गोष्टी त्याच्यासाठी अधिक सोप्या बनतात. त्यामुळे लेंथ गोलंदाजी करण्याचा विचार होता. त्याने सहा षटकार जरी मारले असते, तरी काही फरक पडला नसता. कारण लेंथ बॉलवर शॉट खेळणे त्याला कठीण जाईल, असे आम्हाला वाटत होते. सामना रंगात होता, पण त्याच्या विकेटनंतर आम्ही विजय मिळवून शकतो, असे वाटले. या विकेटनंतर मलाला शांतता मिळाली. असे असले तरी, शेवटच्या विकेटनंतरच आपण जिंकू, असे मनात चालू होते. कारण गुजरात टायटन्स आधीही काही सामन्यांमध्ये निराशाजनक पद्धतीने पराभूत झाली आहे, तर काही सामन्यांत संघाला विजय मिळाला आहे.”
दरम्यान, या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर मुंबई इंडियन्स फलंदाजी आणि नंतर गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकली नाही. मुंबईसाठी सूर्यकुमारने 38 चेंडूत सर्वाधिक 61 धावांचे योगदान दिले. रोहित शर्मा निहाल वढेरा ही सलामीवीर जोडी संघाला चांगली सुरुवात देऊ शकली नाही. तिलक वर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण त्यानेही 14 चेंडूत 43 धावा करून विकेट गमावली. एलिमिनेटर सामन्यात मुंबईसाठी 5 धावा खर्च करून 5 विकेट्स घेणारा आकाश मधवाल देखील या सामन्यात अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. आकाशने चार षटकात 52 धावा खर्च करून एक विकेट घेतली. (‘Even if Surya had hit six sixes it wouldn’t have mattered…’, know why Mohit Sharma said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकेकाळचा भारतीय संघाचा ‘पोस्टर बाॅय’ ते सतत चर्चेत राहणारा टीम इंडियाचा प्रशिक्षक
मुंबईचं स्वप्न भंगलं, गुजरात सलग दुसर्यांदा IPL फायनलमध्ये, शुभमन-मोहित विजयाचे हिरो