---Advertisement---

टीम इंडियाविरुद्ध फायनल खेळताना ऑस्ट्रेलियाला जाणवणार ‘त्या’ खेळाडूची कमतरता

---Advertisement---

सिडनी। ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिला टी२० विश्वचषकात काल(५ मार्च) ऑस्ट्रेलिया महिला संघाने दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाचा ५ धावांनी पराभव केला आणि सहाव्यांदा महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

आता रविवारी(८ मार्च) भारतील महिला संघाविरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघाचा अंतिम सामना मेलबर्न येथे होणार आहे. विशेष म्हणजे टी२० विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच अंतिम सामना असेल ज्यात ऑस्ट्रेलियाची एलिसा पेरी खेळणार नाही. याआधी ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या महिला टी२० विश्वचषकाच्या सर्व ५ अंतिम सामन्यात पेरी ऑस्ट्रेलियाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये होती.

२ मार्चला न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध टी२० विश्वचषक २०२०मधील साखळी फेरीचा शेवटचा सामना खेळताना पेरीच्या उजव्या पायाच्या स्नायूंमध्ये ताण (हॅमस्ट्रिंगची दुखापत) आला. त्यामुळे तिला उर्वरित टी२० विश्वचषकातून बाहेर पडावे लागले.

याच दुखापतीमुळे पेरी काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही खेळली नाही. त्यामुळे असे पहिल्यांदाच झाले की टी२० विश्वचषकातील सामन्यात पेरीचा ऑस्ट्रेलियाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश नव्हता.

कालच्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाने २००९ पासून सुरु झालेल्या महिला टी२० विश्वचषकात एकूण ३६ सामने खेळले होते. या सर्व सामन्यात पेरी ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होती.

तिने आत्तापर्यंत टी२० विश्वचषकात ३६ सामन्यात २८.२७ च्या सरासरीने ३११ धावा केल्या आहेत. तसेच १७.७८ च्या सरासरीने आणि ५.७७ च्या इकोनॉमी रेटने ३७ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

सचिन तेंडुलकरचा टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलआधी खास सल्ला….!

खेडेगावातील सुपरस्टार – सुनिल जोशी

४९ वर्षांपूर्वी या दिग्गजाने केले होते भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---