---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यातील पाच पराक्रम, जे टीम इंडियाला बनवतील टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन

team-india
---Advertisement---

भारतीय संघासाठी नुकताच पार पडलेला इंग्लंड दौरा समाधानकारक राहिला. दौऱ्याच्या सुरुवातील भारताने मागच्या वर्षी कोरोनाच्या कारणास्तव रद्द केलेला कसोटी सामना पुन्हा खेळला. इंग्लंडने हा कसोटी सामना जिंकला, परंतु त्यानंतर खेळल्या गेलेल्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

इंग्लंडविरुद्धची टी-२० आणि एकदिवसीय या दोन्ही मालिका भारताने १-२ अशा अंतराने नावावर केल्या. आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवार भारतीय संघाचे हे प्रदर्शन पाहून चाहते आनंदी आहेत. आपण या लेखात अशा पाच खेळाडूंची माहिती घेणार आहोत ज्यांनी इंग्लंड दौरा गाजवला आहे आणि टी-२० विश्वचषकातही ते महत्वाचे भूमिका पार पाडू शकतात.  

सूर्यकुमार यादवने संपवला चौथ्या क्रमांकाचा पेच –
इंग्लंडविरुद्ध खेळताना भारताचा ३१ वर्षीय  फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. उभय संघातील टी-२० मालिकेत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये सूर्यकुमारने १७१ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याच्या एका शतकाचाही समावेश होता. सामन्यात त्याने ज्या आक्रमकतेसह फलंदाजी केले, ते पाहून प्रत्येकजण हैराण आहे. विशेष म्हणजे क्रमांक ४ वर खेळताना त्याने अशा पद्धतीचे प्रदर्शन केले आहे. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमारचे दमदार प्रदर्शन पाहून कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही नक्कीच आनंद झाला असावा.

हार्दिक पंड्याने भरली संघातील अष्टपैलू कमतरता –
मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषका अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) खूपच खराब फॉर्ममध्ये दिसला होता. परंतु त्यानंतर त्याने काही काळ विश्रांती घेतली आणि स्वतःची फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले.  आयपीएल २०२२ मध्ये जोरदार पुनरागमन करणाऱ्या हार्दिकने इंग्लंड दौरा चांगलाच गाडवला. उभय संघातील टी-२० आणि नंतर एकदिवसीय मालिकेत हार्दिकने चार विकेट्सचा हॉल घेतला. अलीकडच्या काळात त्याच्या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असून आगामी टी-२० विश्वचषकातही भारतासाठी तो चमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे.

रवींद्र जडेजानेही वाढवल्या अपेक्षा –
असे म्हटले जाते की, ज्या संघात चांगले अष्टपैलू खेळाडू असतात, तो संघ मोठी कामगिरी करू शकतो. सध्याच्या भारतीय संघात हार्दिक पंड्या आणि त्याच्या जोडीला दिग्गज रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आहे. अष्टपैलूंच्या या जोडीने इंग्लंड दौरा गाजवला. इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यात जडेजाने दमदार फलंदाजी केली होती. सामन्याच्या पहिल्या डावात जडेजाच्या शतकामुळेच भारताला अपेक्षित धावसंख्या उभी करता आली होती. त्याव्यतिरिक्त टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत देखील जडेजा चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. अशात टी-२० विश्वचषकात चाहत्यांच्या जडेजाकडून अधिक अपेक्षा असतील.

विराटच्या अनुपस्थितीत दीपक हुड्डाने दाखवली गुणवत्ता –
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मागच्या बऱ्याच दिवसांपासून अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. पूर्वी ज्या गोलंदाजांची बेदम धुलाई करायचा आज मात्र त्यांच्याविरोधात धावा करण्यासाठी विराटला झगडावे लागत आहे. मधल्या काळात विराट काही सामन्यामध्ये खेळला नाही. त्याच्या अनुपस्थितीत दीपक हुड्डाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. हुड्डाने प्रथम तर आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत दमदार प्रदर्शन केले होते. त्यानंरत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातही त्याने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. संधीचे सोने केलेल्या हुड्डावर कर्णधार आणि संघ व्यवस्थापन नक्कीच खुश असेल.

रिषभ पंतचेही अप्रतिम प्रदर्शन –
भारताचा २४ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला नेहमीच भारतीय संघाचे भविष्य म्हणून पाहिले जाते. त्याने इंग्लंड दौऱ्यात ही गोष्ट सिद्ध देखील केली. पंतने यष्टीपाठी त्याची कमाल दाखवची आहे, पण फलंदाजीमुळेही सर्वाचे लक्ष वेधित केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने शतक ठोकले होते, तसेच उभय संघातील कसोटी मालिकेत देखील पुन्हा एकदा शतक ठोकून संघाला विजय मिळवून दिला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

स्टोक्सने स्वत:च्याच पायावर मारलेली कुऱ्हाड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झालेला विचित्र पद्धतीने बाद

काय सांगता, बेन स्टोक्सला झाली होती अटक! नक्की काय आहे प्रकरण

ब्रेकिंग! या देशातील आणखीन एका दिग्गजाची निवृत्ती, क्रिकेटविश्वाला धक्का

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---