बिग बॉस या प्रसिद्ध नामांकित शोची लोकप्रियता भारतात सर्वाधिक प्रमाणात आहे. नोव्हेंबर २००६ मध्ये सुरु झालेल्या बिग बॉसचा १४ वा सीजन नुकताच संपला. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान आपली सूत्रसंचालनाची जबाबदारी अत्यंत चोखरित्या बजावतो.
याच शोच्या मागील काही सीजनमध्ये काही अशा नामंकित चेहऱ्यांनी देखील सहभाग नोंदविला होता ज्यांना कधीच विसरता येत येणार नाही. यामध्येच काही बॉलिवूड सिनेतारका, अभिनेते , क्रिकेटपटू तर काही राजकारणी यांचा देखील समावेश होता.
महत्वाचे म्हणजे बिग बॉसचे आजवर अनेक सीजन झाले, मात्र त्यामध्ये एकाही क्रिकेटपटूला बिग बॉस या रियॅलिटी शो मध्ये आजवर कधीच अंतिम फेरीपर्यंत मजल मारता नाही आली. या लेखात आपण अशाच काही क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना बिग बॉसच्या घरात तर प्रवेश मिळाला पण अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात ते अपयशी ठरले.
१) सलील अंकोला (बिग बॉस सीजन १)
सलील अंकोला याने आपल्या करियरची सुरवात १९९० मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून केली होती. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण २१ सामने खेळले. ज्यात २० एकदिवसीय आणि एका कसोटी सामन्याचा समावेश होता. सन १९९७ मध्ये त्याने क्रिकेटला राम राम ठोकत आपला शेवटचा सामना खेळला. ११९८ मध्ये ते क्रिकेट मधून निवृत्त झाल्यांनतर सलील अंकोलाने टीव्ही इंड्रस्टी मध्ये आपले नशीब आजमावायला सुरवात केली आणि याच दरम्यान तो बऱ्याच टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम करताना दिसले. बिग बॉस सीजन १ च्या शो मध्ये २००६ साली सलीलने भाग घेतला होता. परंतु त्याचा करार हा दुसऱ्या प्रोडक्शन हाऊस सोबत असल्यामुळे पहिल्या आठवड्यातच त्याला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला.
२) नवज्योत सिंह सिद्धू (बिग बॉस सीजन ६)
सध्या राजकारणात सक्रिय असणारे आणि क्रिकेट मधून यापूर्वीच संन्यास घेतलेले नवज्योत सिंह सिद्धू यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत भारतासाठी ५१ कसोटी आणि १३६ एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे ३२०२ आणि ४४१३ इतक्या धावा काढल्या होत्या. २०१२ साली बिग बॉसच्या सहाव्या सीजनमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. पण आपल्या दुसऱ्या वचनबद्धतेमुळे सुमारे पाच आठवडे चांगले काम करून देखील अवघ्या ३५ दिवसातच त्यांना बिग बॉसचे घर सोडावे लागले.
३) विनोद कांबळी (बिग बॉस सीजन ३)
भारतीय टीमचा माजी फलंदाज विनोद कांबळी याने देखील बिग बॉस सारख्या रियॅलिटी शो मध्ये तिसऱ्या सीजन मध्ये आपला सहभाग नोंदविला होता. भारतासाठी १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळणारा विनोद कांबळी हा बिग बॉस मध्ये वाईल्ड कार्ड इंट्री म्हणून आला होता. परंतु अतिशय कमी कालावधीतच त्याला घरातून बाहेर जावे लागले. त्याचप्रमाणे विनोद कांबळी हे काही चित्रपटात देखील दिसले होते.
४) एस श्रीशांत (बिग बॉस सीजन १२)
सन २०१३ मध्ये मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात अडकला गेलेला एस श्रीशांत हा क्रिकेट नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला दिसून आला. २०१८ मधील बिग बॉसच्या बाराव्या सीजन मध्ये श्रीशांत आपल्या चाहत्यांच्या पुन्हा एकदा नजरेस पडला. या शो मध्ये त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बरेच खुलासे केले आणि या शोच्या यशात श्रीशांत चा मोठा हात असल्याचे दिसून आले.
५) अँड्रयू सायमंड्स (बिग बॉस सीजन ५)
ऑस्ट्रेलिया संघाचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटर अँड्रयू सायमंड्स हा बऱ्याच वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकले होता. परंतु त्याच्यामुळेच ऑस्ट्रेलिया संघाने अनेक सामने देखील जिंकले होते. अँड्रयू सायमंड्सने देखील बिग बॉसच्या पाचव्या सीजनमध्ये अतिथी म्हणून सहभाग नोंदवला होता. मात्र त्यानंतर दोन आठवड्यातच त्याला घर सोडावे लागले होते.