क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये काही वेळेस महत्वाच्या मुद्यांवर एकमत होत नसते. वर्तमान काळात ही अशी परिस्थिती जास्त दिसून येते की, क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेटपटू एकमेकांना समजून निर्णय घेण्याऐवजी एकमेकांना असहमती दर्शवत असतात. अशीच काहीशी परिस्थिती सध्या श्रीलंकन बोर्ड आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये सुरू आहे. अनेक श्रीलंकन खेळाडूंनी आवाज उठवत आपल्याच बोर्डावर टीका केली आहे.
अशा बऱ्याचशा घटना यापुर्वीही घडल्या आहे. आज आपण या लेखात अशाच घटना सांगणार आहोत, ज्यावेळी खेळाडूंनी सार्वजनिकरित्या क्रिकेट बोर्डावर टीका केली होती.
१. कामरान अकमलने निवडकर्त्यांवर टीका करून त्यांना विचारले होते प्रश्न-
पाकिस्तनाचा यष्टीरक्षक फलंदाज कामरान आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. २०१६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या मालिकेत अकमलला डच्चू देण्यात आला होता. त्यावेळी अकमल शानदार फॉर्ममध्ये होता. तरीही त्याला डावलले गेले होते. त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या कामरान अकमलने एका मुलाखतीत जाहीररीत्या निवडकर्त्यांना खरेखोटे ऐकवून प्रश्नांची झोड उठवली होती.
२. मोहिंदर अमरनाथनी जेव्हा निवडकर्त्यांना म्हटले होते “विदूषकांची टोळी”
१९८० च्या दशकात भारतीय फलंदाजांमध्ये मोहिंदर अमरनाथ एक प्रमुख खेळाडू होते. परंतु उत्तम कामगिरी करीत असलेल्या अमरनाथ यांना अचानक संघातून डच्चू देण्यात आला होता. अशी अफवा होती की, अमरनाथ आणि निवडकर्त्यांमध्ये काही मुद्यांवर मतभेद होते, त्यामुळेच त्यांना संघातून नारळ देण्यात आला होता होता. त्यामुळे संतापलेल्या अमरनाथ यांनी निवडकर्त्यांना “विदूषकी टोळी” म्हणून त्यांची हेटाळणी केली होती. परंतु १९८३ सालच्या वनडे विश्वचषकाद्वारे संघात पुनरागमन करत त्यांनी जेतेपद जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
३. एशेस मालिकेपूर्वी बोर्डाने पीटरसनला दाखवला होता बाहेरचा रस्ता
जेव्हा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जाहीररीत्या सांगितले होते की, केविन पीटरसन एशेस मालिकेसाठी संघाचा हिस्सा नसेल. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता आणि निवडकर्त्यांवर प्रश्न उपस्थित केले गेले होते. परंतु पाहिले गेले तर पीटरसन नेहमी कोणत्यातरी कारणास्तव बोर्डासोबत वाद घालायचा आणि बोर्डावर टीका देखील करत असायचा. त्यामुळे त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नव्हती. पीटरसन इंग्लंडचा दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये १०० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत.
४. श्रीलंकन खेळाडूंचा बोर्डासोबत झालेल्या करारास मान्यता देण्यास नकार
ही आताची वर्तमान घटना आहे, ज्यात श्रीलंकन खेळाडूंनी बोर्डाने केलेल्या नव्या करारास मान्यता देण्यास सपशेल नकार दिला दिला आहे. नव्या करारानुसार बोर्ड खेळाडूंना कमी पगार देणार होते. परंतु हा नवीन करार करण्यास एकही खेळाडू तयार नाही. सर्व खेळाडू जुनाच करार स्वीकारण्यास तयार असून त्यासोबतच त्यांनी बोर्डाला आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बोर्डाने खेळाडूंचे मूल्यांकनही केले पाहिजे.
६. जेव्हा वेस्ट इंडिज बोर्डासोबत भिडला ब्रावो
वेस्ट इंडिज बोर्ड अशा घटनांमुळे कायमच चर्चेत असते. परंतु २०१४ साली जेव्हा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावो जेव्हा वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार होता. त्यावेळी त्याच्या पगारावरून काहीतरी विषय समोर आला होता. ज्यासाठी ब्रावोने बोर्डाला विनंती अर्ज देखील केला होता. परंतु बोर्डाने ब्रावोच्या अर्जाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे प्रचंड नाराज झालेला ब्रावो भारत दौरा अर्धा सोडून तो निघून गेला होता. ज्यामुळे सगळे चकित झाले होते. त्यानंतर ब्रावो अधिकतर फ्रँचायझी क्रिकेटच खेळताना दिसून येतो. परंतु बोर्डाने टी२० विश्वकप स्पर्धेत ब्रावोला वेस्ट इंडीज संघात सामील करून घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआरला तिसऱ्या जेतेपदाची आस, मॉर्गनच्या अनुपस्थित ‘हे’ खेळाडू बनू शकतात नवे कर्णधार
‘या’ क्रिकेटपटूंनी युवा वयातच लीलया पेलली कर्णधारपदाची जबाबदारी, एका भारतीयाचा समावेश
अशी ३ कारणे, ज्यामुळे युएईत आयपीएल खेळवण्याचा निर्णय ठरू शकतो अयशस्वी