आगामी एकदिवससीय विश्वचषक २०२३ मध्ये खेळवला जाणार आहे. भारत या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. वास्तविक, भारताने यापूर्वी १९८७, १९९६ आणि २०११ मध्ये ५० षटकांच्या विश्वचषकाचे आयोजन केले होते. अशा प्रकारे भारत चौथ्यांदा ५० षटकांच्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. यापूर्वी २०११ मध्ये भारतात ५० षटकांचा विश्वचषक आयोजित करण्यात आला होता, तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन बनली होती.
टॉप ८ संघ थेट पात्र ठरतील
त्याचबरोबर पुढील वर्षी २०२३च्या विश्वचषकात ८ संघ सहभागी होणार आहेत. तसेच, आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगमधील टॉप-८ संघ आगामी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील. सध्याच्या क्रिकेट विश्वचषक सुपर लीगच्या पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर २०१९चा चॅम्पियन इंग्लंड पहिल्या तर ऑस्ट्रेलिया ८ व्या क्रमांकावर आहे. इंग्लंड १८ सामन्यांनंतर १२५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
8 teams directly qualify into the ODI World Cup 2023. pic.twitter.com/mqugWKxboC
— Johns. (@CricCrazyJohns) July 15, 2022
गुणतालिकेत इंग्लंड अव्वल, तर भारत सातव्या क्रमांकावर आहे
भारतीय संघ विश्वचषक सुपर लीगच्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. भारताचे १२ सामन्यांत ७९ गुण आहेत. त्याचबरोबर १९९६ चा विश्वचषक जिंकणारा श्रीलंका सध्या १० व्या क्रमांकावर आहे. वास्तविक, जर भारतीय संघ टॉप-८ मध्ये स्थान मिळवू शकला नाही, तर टॉप-७ संघांव्यतिरिक्त, भारतीय संघ पात्र ठरेल, कारण भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. तथापि, जर आपण टॉप-८ संघांबद्दल बोललो तर, इंग्लंड व्यतिरिक्त बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, भारत आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘…म्हणून मी रात्री विराट कोहलीला समर्थन करणारी पोस्ट शेअर केली’, बाबर आझमने दिले स्पष्टीकरण
धोनीचा पठ्ठ्या टी२०त गाजतोय! केवळ १९ चेंडूत १०० धावा करत गाजवलंय मैदान