बुधवारी (दि. 22 मार्च) चेन्नई येथे भारताला ऑस्ट्रेलिया संघाकडून 21 धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवानंतर भारताने 3 सामन्यांची वनडे मालिका 1-2ने गमावली. विशेष म्हणजे, वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा भारतातच होणार आहे. अशात भारतीय संघाच्या माजी फलंदाजाने विश्वचषकाविषयी मोठे भाष्य करत एकच खळबळ माजवली आहे. चला तर माजी खेळाडूने काय म्हटले आहे, जाणून घेऊयात…
भारतीय संघाने गमावली मालिका
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडिअमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारतीय संघ फिरकीपटूंसमोर खास कामगिरी करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारतापुढे 270 धावांचे आव्हान उभे केले होते. मात्र, भारताला 248 धावाच करता आल्या. अशात भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने मोठे विधान केले आहे.
What a game 💥
Australia clinch the decider in Chennai to bag the ODI series 2-1 🙌#INDvAUS | 📝: https://t.co/ugxHxHyT1z pic.twitter.com/5kU9WRDiYP
— ICC (@ICC) March 22, 2023
खेळपट्टीबाबत काय म्हणाला चोप्रा?
आकाश चोप्रा याने खेळपट्टीबाबत बोलताना म्हटले की, जर भारतीय संघाला वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल, तर त्यांना सपाट खेळपट्टीवरच यश मिळू शकते. त्याच्यानुसार, फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाजांना फायदेशीर असलेल्या खेळपट्टीवर भारतीय संघाच्या चिंता वाढतील. खरं तर, चेन्नई वनडे (Chennai ODI) सामन्यात फिरकीपटू ऍडम झम्पा याने 4 विकेट्स घेतल्या होत्या, तर ऍश्टन एगर याने 2 विकेट्स नावावर केल्या होत्या. या सामन्यात संघाला फिरकीपटूंविरुद्ध खेळताना संघर्ष करावा लागला, तर दुसऱ्या वनडेत वेगवान गोलंदाजांनी चिंतेत टाकले.
‘विश्वचषकातही भारत होऊ शकतो यशस्वी’
आकाश चोप्रा याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना विश्वचषकाविषयी भाष्य केले. तो म्हणाला की, “भारतीय संघाला विश्वचषकात फिरकी आणि वेगवान गोलंदाजीला फायदेशीर असणाऱ्या खेळपट्ट्यांची गरज नाहीये. सपाट खेळपट्टीवरच भारतीय संघ यशस्वी होऊ शकतो. माझ्या मते, विश्वचषकात आपल्याला रस्त्यासारख्या सपाट खेळपट्ट्यांची गरज पडेल. कारण, आपल्याला फिरकी आणि वेगवान खेळपट्ट्या नको आहेत. जेव्हा चेंडू स्विंग झाला, तेव्हा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागला. 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आपण 5 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर 117 धावांवर संघ सर्वबाद झाला. तसेच, जेव्हा चेंडू वळला, तेव्हा आपण 270 धावांही करू शकलो नाहीत.”
आता आकाश चोप्राच्या या विधानानंतर वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील खेळपट्ट्यांमध्ये बदल होतो की नाही, तसेच भारत कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (former cricketer aakash chopra says team india will need absolute road like pitches in odi world cup 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023पूर्वी KKRला धक्क्यावर धक्के! कॅप्टन अय्यरनंतर ‘हा’ वेगवान गोलंदाजही दुखापतग्रस्त
हार्दिक पंड्याचे कर्णधारपद धोक्यात! ‘या’ वादळी फलंदाजाने ठोकला दावा