भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात दमदार फलंदाजी करताना 336 धावांचा डोंगर उभारला होता. त्याचबरोबर भारतीय संघाने सुद्धा आपल्या पहिल्या डावात खराब सुरुवात होऊन देखील 336 धावा केल्या. त्यामुळे हा सामना मजेदार होताना दिसत आहे. आता या सामन्यावर इयान चॅपेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांचे म्हणणे आहे की, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघातील कमजोर फलंदाजीमुळे ही मालिका रोमांचक होत आहे. मात्र सध्या बॉर्डर-गावसकर मालिका तीन सामन्यांच्या समाप्तीनंतरसुद्धा बरोबरीत आहे. दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे, तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. त्यामुळे जो संघ चौथा कसोटी सामना जिंकेल तो मालिका आपल्या नावावर करेल.
माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार इयान चॅपेल यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोसाठी कॉलम लिहिताना म्हटले आहे की, “दोन्ही संघातील कमकुवत फलंदाजीने ही मालिका रोमांचक करण्यासाठी योगदान दिले आहे. जास्तीत जास्त दोन्ही संघ सर्वबाद होत आहेत. त्याचबरोबर दोन्ही संघ सातत्याने दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरत आहेत. भारताने दाखवलेले धैर्य आणि लढाई बरोबरीची आहे. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमनाने आणि हार न मारण्याच्या स्वभावानेसुद्धा रोमांच निर्माण झाला आहे. ”
इयान चॅपेल यांना विश्वास आहे की जर भारत आणि ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचले. त्याचबरोबर दोन्ही संघ आपल्या पूर्ण ताकदीने उतरले. तर हा सामना खूप रोमांचक होईल. इयान चॅपेल म्हणाले, भारतीय फलंदाजी पहिल्यासारखी फिरकी गोलंदाजापुढे प्रभावशाली नाही. त्यांनी पुढे लिहले, “पहिली गोष्ट म्हणजे आता हे म्हणने चूकीचे ठरणार नाही की, भारतीय फलंदाज फिरकीचे सर्वात चांगले खेळाडू आहेत. ते बाकीच्यांप्रमाणे खूप खराब नाहीत. परंतु निश्चितपणे खासही नाहीत.”
इयान चॅपेल यांनी पुढे लिहले, “या मालिकेत अशा बर्याच संधी आल्या आहेत, जेव्हा फिरकी समोर त्यांची स्मार्ट फलंदाजी दिसली नाही. सिडनी कसोटी सामन्यातील पहिल्या डावातील रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा याची सर्वात मोठी उदाहरणे आहेत. ते नॅथन लायनच्या प्रत्येक चेंडूवर पुढे येऊन रक्षात्मक खेळत होते. जे की ते फक्त फूटवर्क नाही, तर संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. लायनने दोघांना बाद केले नाही, परंतु माझ्या हिशोबाने त्यांचे फुटवर्क नाही तर नशिब चांगले होते.”
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ : ११ फेब्रुवारी नाही तर ‘या’ दिवशी होऊ शकतो लिलाव
भारताकडून ‘असा’ पराक्रम करणारा वॉशिंग्टन सुंदर तिसराच खेळाडू
गेट वेल सून टीम इंडिया! ब्रिस्बेन कसोटीदरम्यान चाहतीने झळकावले अनोखे पोस्टर, फोटो व्हायरल