---Advertisement---

‘विराटने भारतासाठी जे काही केले…’, WTC Finalनंतर कोहलीविषयी गंभीरची सर्वात मोठी प्रतिक्रिया

Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय संघ मागील 10 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पाहतोय, पण संघाचे स्वप्न पुन्हा एकदा स्वप्नच बनून राहिले. जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023चा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रविवारी (दि. 11 जून) लंडनच्या के ओव्हल मैदानात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी जिंकत किताब आपल्या नावावर केला. यासह ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकणारा जगातील पहिला संघ बनला. दुसरीकडे, भारताच्या पराभवानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर याने विराट कोहली आणि एमएस धोनी याच्याविषयी मोठे भाष्य केले आहे.

विराटविषयी काय म्हणाला गंभीर?
खरं तर, आयपीएल 2023 हंगामातील एका सामन्यात गौतम गंभीर आणि विराट कोहली (Gautam Gambhir And Virat Kohli) यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यामुळे नेटकऱ्यांनीही हा वाद उचलून धरला होता. अशात आता पुन्हा गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने विराट कोहली (Virat Kohli) याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “विराट कोहलीने भारतासाठी जे काही केले आहे, त्यासाठी माझ्या मनात खूप आदर आहे.”

याव्यतिरिक्त 2011च्या वनडे विश्वचषक विजयाचे सर्व श्रेय तत्कालीन कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) यालाच मिळाल्याचे नेहमी बोलले जाते. गंभीरने त्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती, तर धोनीनेही विजयी षटकार मारत 91 धावा चोपल्या होत्या. मात्र, विजयाचे सर्व श्रेय धोनीलाच मिळाल्याचा आरोप अनेकदा नेटकऱ्यांकडून केला जातो. गंभीरनेही याविषयी अनेकदा भाष्य केले आहे. मात्र, आता त्याने पुन्हा एकदा विराट कोहली आणि एमएस धोनी (Virat Kohli And MS Dhoni) यांच्याविषयी प्रतिक्रिया दिली.

गंभीर म्हणाला की, “माझे एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्याशी नाते सारखेच आहे. जर आमच्यात काही वाद झाला, तर तो मैदानातच राहतो, मैदानाबाहेर जात नाही. आमच्यात वैयक्तिक असे वाद नाहीत. मला जितका संघासाठी विजय मिळवावा वाटतो, तितकाच त्यांनाही संघासाठी विजय मिळवावा वाटतो.”

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याचा निकाल
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघापुढे विजयासाठी 444 धावांचे आव्हान उभे ठाकले होते. मात्र, भारतीय संघाची वरची फळी खास कमाल दाखवू शकली नाही. नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्या. शेवटी भारतीय संघाचा डाव 234 धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या डावात भारताकडून विराट कोहली (Virat Kohli) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 78 चेंडूंचा सामना करताना 7 चौकारांच्या मदतीने 49 धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त अजिंक्य रहाणे (46) आणि रोहित शर्मा (43) यांनी मोलाचे योगदान दिले. इतर एकही फलंदाज खास कामगिरी करू शकला नाही. परिणामी भारताला हा सामना 209 धावांनी गमवावा लागला. (Gautam Gambhir on virat kohli after india defeat in wtc final 2023)

महत्वाच्या बातम्या-
IND vs AUS : कोच द्रविडने ‘या’ खेळाडूंवर काढला राग, सामना हारण्यामागील मोठ्या कारणाचाही केला खुलासा
ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन! WTC Final गमावल्यानंतर द्रविडकडून पराभवापेक्षा विरोधकांच्या विजयाला महत्व

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---