मंगळवारी (दि. 03 जानेवारी) मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना भारतीय संघाने 2 धावांनी आपल्या नावावर केला. हा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याकडे आहे. मात्र, आता त्याचाच बदली खेळाडू शोधायला हवा असे वक्तव्य माजी सलामीवीर गौतम गंभीर याने केले.
या पहिल्या सामन्यात समालोचन करत असताना गौतम गंभीरने अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. त्याचवेळी भारताच्या क्षेत्ररक्षणादरम्यान झेल घेताना हार्दिक पंड्या याला किरकोळ दुखापत झाली. तो लंगडत मैदानाबाहेर गेला मात्र अवघ्या काही मिनिटात तो पुन्हा मैदानात आला. मात्र, हाच धागा पकडून समालोचन करत असलेल्या गंभीरने म्हटले,
“हार्दिक हा भारताच्या सध्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी आहे. मात्र, मी असे म्हणेल की आपल्याला लवकरच त्याच्या पर्यायी खेळाडूची व्यवस्था करावी लागेल. क्वचित काही अनपेक्षित घडल्यास अथवा तो दुखापतग्रस्त झाल्यास तशाच पद्धतीचा खेळाडू नसल्यास संघाचे मोठे नुकसान होईल.”
हार्दिक हा फलंदाजी गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात एकसारखे योगदान देण्यासाठी ओळखला जातो. सातत्यपूर्ण कामगिरी व नेतृत्व कौशल्याच्या बळावर तो टी20 संघाचा नियमित कर्णधारही होऊ शकतो. गंभीरने उपस्थित केलेला मुद्दा ग्राह्य धरल्यास त्याच्यासारखीच गुणवत्ता असलेले अगदी काहीच खेळाडू भारतीय संघाच्या आसपास राहिले आहेत. मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबे व मध्य प्रदेशचा व्यंकटेश अय्यर यांनी हार्दिकच्या अनुपस्थितीत संघासाठी अष्टपैलूची भूमिका पार पाडलेली. मात्र, संघातील आपले स्थान टिकून ठेवण्यात त्यांना अपयश आले.
(Gautam Gambhir Want Hardik Pandya Backup Soon)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतबाबत मोठी अपडेट! स्टार विकेटकीपरवर पुढील उपचार मुंबईमध्ये होणार
INDvSL: विकेट घेण्यात हार्दिक अपयशी, मात्र नोंदवला अनोखा विक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कॅप्टन