मुंबई । भारताचा अनुभवी फिरकीपटू ‘टर्बनेटर’हरभजन सिंग गेल्या अनेक वर्षांपासून निळ्या जर्सीत दिसून आला नाही. त्याच्या सहकारी खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारली असली तरी हरभजनने मात्र हार मानली नाही. आयपीएलमध्ये मात्र तो दमदार कामगिरी करत आहे.
नुकतेच सोशल मीडियावर एका मुलाखतीत हरभजनने त्याच्या पुनरागमनाबाबत बोलताना म्हणाला की,”आज तो तंदुरुस्त असून भारताच्या कोणत्याही टॉप फिरकी गोलंदाजासोबत स्पर्धा करण्याची तयारी आहे.”
आपल्या तंदुरुस्तीविषयी बोलताना हरभजन सिंगने भारतीय संघाच्या निवड समितीला खुले आव्हान दिले आणि तो म्हणाला की, “भारतातील कोणत्याही सर्वोत्तम युवा फिरकीपटूशी मी स्पर्धा करू शकतो आणि त्यांना पराभूत करण्याची ताकद अजूनही आपल्याकडे आहे.”
वयाच्या 40 ला पोहोचलेल्या हरभजनसिंगने निवड समितीने संधी न दिल्याबद्दल आपले वाढते वय आणि तंदुरुस्ती असल्याचे नमूद केले आहे. यामुळे भज्जी याने निवडकर्त्यांवर निशाणा साधत खुले आव्हान देत म्हणाला की, “तो कोणत्याही वयोगटातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूशी स्पर्धा करू शकतो, तरीही तो कौशल्यच्या बाबतीत अजूनही कोणापेक्षा कमी आहे.”
तो म्हणाला, ‘मी अजूनही 100% तंदुरुस्त आहे, जर तुम्हाला माझी तरूण खेळाडूंशी तुलना करायची असेल तर माझ्या कौशल्याची चाचणी तुम्हाला सर्वोत्तम वाटणाऱ्या खेळाडूंबरोबर घ्या,” असेही हरभजन सिंगने नमूद केले.
स्थानिक क्रिकेट न खेळता आपण आयपीएलमध्ये इतकी चमकदार कामगिरी कशी केली असा प्रश्न जेव्हा हरभजनसिंगला विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, “त्याच्या कौशल्यामध्ये अजूनही कोणतीही कमतरता नाही. मी भारतासाठी किमान 800 दिवस मैदानावर खेळलो आहे. मी इतके साध्य केले आहे की, कोणालाही सहानुभूतीची गरज नाही. आपण कौशल्यांबद्दल बोलल्यास आपण कोणाबरोबरही माझी परीक्षा घेऊ शकता. मी अजूनही तयार आहे. प्रत्येकाची स्वतःची पद्धत असते. मी नेटवर महिन्यात 2000 बॉल टाकतो, तर ते माझ्यासाठी पुरेसे आहे.”
विशेष म्हणजे, यावर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची तयारी करत असलेला रवी बिश्नोई आणि कार्तिक त्यागी यासारख्या खेळाडूंचा भज्जीच्या कसोटी पदार्पणानंतर जन्म झाल्याचे हरभजनसिंगला सांगण्यात आल्यावर त्याला हसू आले. लॉकडाऊनमुळे त्याला खूप विश्रांती मिळाली आहे आणि आता तो पूर्वीपेक्षा अधिक तंदुरुस्त असल्याचे तो सांगतोय.