भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यावर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून चमकदार कामगिरी करत आहे.
हरभजनला चेन्नईने मागीलवर्षीच्या लिलावात बोली लावत संघात घेतले होते. त्याआधी हरभजन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. तसेच त्याने मुंबईकडून 10 वर्षे खेळताना मुंबईने जिंकलेल्या तीन आयपीएल विजेतेपदांमध्ये महत्त्वाचे योगदानही दिले आहे.
आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईमध्ये नेहमीच कडवी झुंज पहायला मिळते. पण या दोन्ही संघांकडून हरभजन खेळला असल्याने त्याने या दोन्ही संघातील फरक सांगितला आहे.
हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार हरभजन म्हणाला, ‘मी मुंबई इंडियन्सचा खूप आदर करतो. ते यावर्षीही चांगले आहेत. पण तिथे(मुंबई इंडियन्स) जिंकण्याचा दबाव जास्त असतो. इथे चेन्नई सुपर किंग्ज संघात थोडा दबाव कमी आहे. तूम्ही जिंकणे आपेक्षित आहे, पण हा जीवन मरणाचा प्रश्न इथे(चेन्नई सुपर किंग्ज) नाही.’
हरभजनने यावर्षी चेन्नईकडून आत्तापर्यंत 3 सामन्यात खेळताना 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्ज इलेव्हन विरुद्ध झालेल्या या दोन सामन्यात सामनावीरही ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–अश्विन विरुद्ध ‘मंकडींग’ पासून वाचण्यासाठी अशी घेतली वॉर्नरने खबरदारी, पहा व्हिडिओ
–प्रो कबड्डी लिलावात सलग दुसऱ्यांदा हा खेळाडू झाला करोडपती
–त्या दोन नो बॉलनंतर धोनीच्या प्रतिक्रियेबद्दल दीपक चहरने केला खूलासा