क्रिकेट हा असा खेळ आहे, ज्यामध्ये वयाची कोणतीही मर्यादा नसते. प्रतिभेच्या बळावर क्रिकेटपटू युवा किंवा ३०-४० पेक्षा जास्त वयातही आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळताना दिसतात. असेच भारतीय क्रिकेट संघाकडून टी२० स्वरूपात झालेल्या आशिया चषक २०१६ मध्ये खेळलेले २ खेळाडू आहेत, ज्यांमधील एक खेळाडू आता आयपीएलमध्ये एका फ्रँचायझीचा कर्णधार आहे, तर दुसरा खेळाडू त्याच फ्रँचायझीने नेतृत्त्व करतो आहे. याच २ खेळाडूंबद्दल सविस्तर माहिती घेऊ…
१९८४ साली सुरुवात झालेली आशिया चषक स्पर्धा (Asia Cup) २०१८ पर्यंत १३ वेळा खेळली गेली आहे. २०२२मध्ये ही स्पर्धा युएईमध्ये होणार आहे. ७ वेळा भारतीय संघाने (Team India) ही स्पर्धा आजपर्यंत जिंकली आहे. ही स्पर्धा सुरु झाल्यापासून केवळ २०१६साली टी२० प्रकारात खेळवली गेली आहे. त्यानंतर दुसऱ्यांदाच म्हणजे यावर्षी ही स्पर्धा टी२० प्रकारात खेळवली जाणार आहे.
२०१६ मध्ये पहिल्यांदाच टी२० स्वरूपात झालेल्या या स्पर्धेत भारताकडून वेगवान गोलंदाज आशिष नेहरा (Ashish Nehra) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) खेळले होते. या हंगामात नेहराने ४ सामने खेळताना ७.०७ च्या इकोनॉमी रेट्सने ६ विकेट्स घेतल्या होत्या. तर त्यावेळी युवा असलेल्या पंड्याने ५ सामन्यात ७ विकेट्सची कामगिरी केली होती.
आशिया चषकाच्या या हंगामानंतर लगेचच नेहराने २०१७ मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर तब्बल ६ वर्षांनंतर पुन्हा एकदा टी२० स्वरूपात होणाऱ्या या स्पर्धेत फक्त हार्दिक पुन्हा एकदा उतरणार आहे. हेच ते दोघे खेळाडू आहेत, जे आशिया चषक २०१६ मध्ये खेळाडू म्हणून खेळलेले आणि आता आयपीएलमध्ये एकाच फ्रँचायझीचे कर्णधार व प्रशिक्षक आहेत. आयपीएल २०२१ मध्ये नवख्या गुजरात टायटन्स संघाचे (Gujrat Titans) नेतृत्त्वपद हार्दिकच्या हाती देण्यात आले होते. त्याने या हंगामात कर्णधार म्हणून दमदार प्रदर्शन करत आयपीएल ट्रॉफीही जिंकली होती. तर नेहरा गुजरात संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघातून बाहेर असलेल्या गोलंदाजाचे इंग्लंडमध्ये जबरदस्त प्रदर्शन, व्हायरल होतोय व्हिडिओ
एशिया कपमध्ये टीम इंडियासाठी पाकिस्तान नाही तर ‘हा’ संघ ठरतोयं डेंजर
अरे, नक्की चाललंय तरी काय! एशिया कपसाठी आवेश इन, शमी आउट; फॅन्स भडकले निवडकर्त्यांवर