ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) रविवारी (23 ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेलेला हा सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला. या सामन्यात भारताकडून स्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी भारताच्या विजयात महत्वाची भुमिका निभावली. या सामन्यानंतर बोलताना हार्दिकने आपल्या नजीकच्या काळातील यशाचे रहस्य उलगडले.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने पाकिस्तानविरुद्ध चमकदार खेळ दाखवल. सुरूवातीला त्याने गोलंदाजी करताना 4 षटकात 30 धावा देत 3 प्रमुख बळी घेतले. तसेच फलंदाजीत संघाचे चार फलंदाज केवळ 31 धावांवर बाद झालेले असताना 40 धावांची महत्वाची खेळी केली.
या सामन्यानंतर बोलताना हार्दिकने मागील सहा महिन्यांपासून आपल्या यशाचे गमक काय आहे हे सांगितले. तो म्हणाला,
“प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आता मी अपयशाला घाबरणे सोडून दिले आहे. निकाल काय लागेल याची मी चिंता करत नाही. केवळ जे लोक चांगले सांगतील त्यावर लक्ष देतो.”
हार्दिक पंड्या मागील संपूर्ण वर्षात सातत्याने अपयशी ठरत होता. 2021 टी20 विश्वचषकात खराब कामगिरी केल्यानंतर त्याने भारतीय संघातून आपले नाव मागे घेतले होते. या काळात त्याने आपल्या तंदुरुस्तीवर विशेष काम केले. 2022 आयपीएलमधून त्याने गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून पुनरागमन केले. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच हंगामात त्याने गुजरातला विजेता बनवले. त्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी देखील त्याला मिळाली. तसेच आशिया चषकात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर तो सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकापेक्षा टी-20 विश्वचषकात भारत-पाक सामना पाहणाऱ्यांची संख्या वाढली, मोडीत निघाले सर्व विक्रम
अस कस घडल! विराट पाकची पिसे काढत असताना बिघडली भारताची अर्थव्यवस्था; वाचा संपूर्ण प्रकरण