मागील वर्षी करण जोहरच्या कॉफी विथ करण या टॉक- शो मध्ये भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने स्त्रियांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावर पंड्याने आता मत व्यक्त करताना ते वर्ष खूप वाईट असल्याचे सांगितले.
“एक क्रिकेटपटू म्हणून आम्हाला हे माहिती नव्हते की काय होणार आहे. परिस्थिती माझ्या हातात नव्हती, तर दुसऱ्याच्या हातात होती. या ठिकाणी दुसऱ्याला निर्णय घ्यायचा होता. ही एक अशी परिस्थिती होती जिथे तुम्हाला स्वत:ला पहायची इच्छा नसते,” असे इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पंड्या म्हणाला.
कॉफी विथ करन या शोमध्ये पंड्याने स्त्रियांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. तसेच बीसीसीआयनेही त्याच्यावर बंदी घातली होती आणि भारतीय संघातून बाहेर केले होते.
टीम इंडिया विरुद्ध टी२० मालिका खेळण्याआधी न्यूझीलंडला बसला मोठा धक्का
वाचा????https://t.co/LyZ4us4cP5????#म #मराठी #Cricket @Tomlatham2 #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) January 9, 2020
…म्हणून पुणे टी२०मध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी शार्दुलची होणार नाही हॅट्रिक
वाचा????https://t.co/nrLleqrGY9????#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvSL @imShard— Maha Sports (@Maha_Sports) January 9, 2020