टीम इंडियाच्या स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik pandya)टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका खास कामगिरीच्या खूप जवळ आहे. बांग्लादेशविरुद्धच्या पुढील सामन्यात जर त्याने 3 विकेट घेतल्या, तर त्याच्या नावावर 100 टी20 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण होतील. ही कामगिरी करणारा तो भारताचा फक्त दुसराच गोलंदाज ठरेल. याआधी डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep singh) हा हा टप्पा गाठला होता. अर्शदीपने ही कामगिरी आशिया कप 2025 मध्ये ओमानविरुद्ध केली होती.
हार्दिकने आतापर्यंत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 118 सामने खेळून 26.63 च्या सरासरीने 97 विकेट्स घेतल्या आहेत आणि भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्याच्या आशिया कपमध्ये त्याने 4 सामन्यांत 3 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध सुपर-4 सामन्यात त्याने 3 षटकांत 29 धावा देऊन 1 विकेट घेतली होती.
जागतिक पातळीवर सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय विकेट्स अफगाणिस्तानच्या कर्णधार राशिद खानच्या (Rashid Khan) नावावर आहेत, ज्याने 103 सामन्यांत 13.93 च्या सरासरीने 173 विकेट्स घेतल्या आहेत.
टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज:
अर्शदीप सिंग – 64 सामने, 100 विकेट्स
हार्दिक पांड्या – 118 सामने, 97 विकेट्स
युजवेंद्र चहल – 80 सामने, 96 विकेट्स
जसप्रीत बुमराह – 73 सामने, 92 विकेट्स
भुवनेश्वर कुमार – 87 सामने, 90 विकेट्स






