जुलै महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. हरमनप्रीत कौर हिने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यानंतर पंच आणि विरोधी संघाच्या खेळाडूंशी वाद घातला होता. यासाठी आयसीसीकडून तिच्यावर कारवाई देखील झाली होती. मात्र, हरमनप्रीत अद्याप स्वतःची चूक मान्य झाली नाहीये.
बांगलादेश आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका चांगलीच रंजक ठरली होती. तिसरा आणि निर्णायक सामना बरोबरीत सुटल्यामुळे मालिका देखील 1-1 अशा बरोबरीने सुटली. शेवटच्या वनडे सामन्यात आपल्या संघाला पराभव मिळाली नाही, याची राग हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने सामना संपल्यानंतर काढल्याचे दिसले होते. हरमनप्रीतने लाईव्ह सामन्यात पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हुज्जत घातली होती. सामना संपल्यानंतर तिने बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानला हिलाही डिवचण्याचा प्रयत्न केला होती.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर आयसीसीकडून हरमनप्रीतला चार डीमेरीट पॉइंट्स मिळाले होते. सोबतच मर्यादित षटकांच्या दोन सामन्यांसठी बंदी देखील घातली गेली. असे असले तरी, हरमनप्रीतला अजूनही आपले काही चुकल्यासारखे वाटत नाही. याविषयी ती म्हणाली, “मी असे म्हणणार नाही की, मला कुठल्या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. कारण खेळाडू म्हणून तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित हव्या असताता. तुमच्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि तुम्हाला जे वाटते ते बोलण्याचा अधिकार आहे. मला नाही वाटत की मी कोणत्या खेळाडूला किंवा एखाद्या व्यक्तिला चुकीचं काही बोलले आहे. मैदानात जे झालं, मी त्याविषयीच बोलले होते. मला कोणत्याच गोष्टीचे पश्चाताव नाहीये.”
दरम्यान, आयसीसीकडून दोन सामन्यांची बंदी घातली गेल्यामुळे हरमनप्रीतला आगामी आशियाई गेम्समध्ये सुरुवातीचे दोन सामने खेळता येणार नाहीत. ही स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयोजित केली गेली आहे. (Harmanpreet Kaur said she does not regret misbehaving against Bangladesh)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकात सुरवातीच्या सामन्यांना मुकणार केएल राहुल, आगरकरांनी दिली ‘मोठी’ माहिती
शिखर धवनची भविष्यवाणी! विश्वचषकात ‘हे’ पाच खेळाडू करणार धमाका, यादीत दोन भारतीय