भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा मैदानावर उतरल्यावर अशी दमदार फटकेबाजी करतो की पाहणारे त्याला फक्त पाहतच राहतात. त्याच्या या दमदार प्रदर्शनामुळे त्याला ‘हिटमॅन’ हे नाव देण्यात आले आहे. पण, खूप कमी जणांना हे माहित आहे की रोहितला त्याचे हे टोपणनाव कसे मिळाले?
भारताचा फिरकीपटू आर अश्विनशी इंस्टाग्राम लाइव्हवर बोलताना रोहितने स्वत: त्याच्या टोपणनावामागील रहस्याचा उलगडा केला आहे. How rohit sharma got hitman nickname.
झाले असे की, अश्विन लॉकडाऊनमध्ये वेळ घालवण्यासाठी इंस्टाग्रामवर भारतीय संघाच्या जुन्या सामन्यांची सीरीज चालवत आहे. यादरम्यान तो त्या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंशी लाइव्ह चर्चा करत असतो. अश्विनने २०१३मध्ये बेंगलोर येथे झालेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा वनडे सामना एपिसोड दाखवला होता.
या सामन्यात रोहितने २०९ धावा करत त्याचे वनडेतील पहिले द्विशतक ठोकले होते. त्यामुळे अश्विनने त्या सामन्याची चर्चा करण्यासाठी रोहितला लाइव्ह बोलवले होेते. दरम्यान या रहस्याचा उलगडा झाला की, रोहितच्या हिटमॅन नावाचा संबंध हा त्याच्या २०९ धावांच्या खेळीशी आहे.
अश्विनने रोहितला त्याला ‘हिटमॅन’ हे नाव कसे मिळाले? हे विचारला असता, “रोहित म्हणाला की यामागचे कारण माझे वनडेतील पहिले द्विशतक आहे. मी जेव्हा २०९ धावांवर बाद होऊन पव्हेलियनला परत जात होतो. तेव्हा स्पोर्ट्स चॅनलचे काही लोक माझी मुलाखत घेण्यासाठी आले होते.’
“त्या मुलाखतीनंतर मला तो व्यक्ति मिळाला. तो युजवेंद्र चहलचा छोटा किंवा मोठा भाऊ आहे. त्याला आपण पीडी या नावाने ओळखतो. यावर अश्विन म्हणाला की, हा तो प्रोड्यूसर डायरेक्टर. मी ओळखतो त्याला. यावर पुढे बोलताना रोहित म्हणाला की, तो मला सारखे सारखे म्हणत होता की, तू हिटमॅनसारखा खेळलास. तू हिटमॅनप्रमाणे षटकार मारले. तिथेच रवी शास्त्री उभे होते. त्यामुळे त्यांनी हिटमॅन हा शब्द त्यांच्या डोक्यात फिट करुन घेतला. जेव्हा बक्षीस वितरण होत होते. तेव्हा शास्त्रींनी मला हिटमॅन म्हणून बोलावण्यास सुरुवात केली आणि तिथून माझे नाव हिटमॅन पडले.”
पुढे अश्विनने रोहितला विचारले की, तू डब्ल्यूडब्ल्यूई मधल्या खऱ्या हिटमॅनला ओळखतोस का? “यावर रोहितने डब्ल्यूडब्ल्यूईच्या प्रसिद्ध फाइटर ब्रेट हार्टचे नाव घेतले. तसेच तो माझा आवडता फायटर आहे,” असेही रोहित म्हणाला.
रोहितने २ नोव्हेंबर २०१३ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी करत १५८ चेंडूत २०९ धावा केल्या होत्या. यात त्याच्या १२ चौकारांचा आणि १६ षटकारांचा समावेश होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
केवळ १ टी२० सामना खेळणारे जगातील ५ प्रसिद्ध क्रिकेटर
भारताचे 3 दिग्गज खेळाडू ज्यांनी आयपीएलचा अंतिम सामना न खेळताही पटकावले…
भारतीय क्रिकेटमधील सर्वात शिकलेला क्रिकेटर, पहिल्याच सामन्यात केला…